TRENDING:

आखाती युद्धाचा असाही फटका, 'ती' टपाल सेवा तात्पुरती बंद, कधी सुरू होणार?

Last Updated:

Post Service: "ही बंदी तात्पुरती असून परिस्थिती स्थिर झाल्यानंतर सेवा पुन्हा सुरू करण्यात येईल, असे टपाल विभागाने स्पष्ट केले आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे : मध्यपूर्वेत वाढत चाललेल्या तणावाचा परिणाम आता भारताच्या टपाल सेवांवरही दिसून येत आहे. हवाई वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे दहा देशांशी असलेली आंतरराष्ट्रीय टपाल सेवा तात्पुरती बंद करण्यात आली आहे. टपाल विभागाने याबाबत अधिकृत सूचना जारी करत संबंधित देशांकडे जाणाऱ्या सर्व टपाल बुकिंगवर तात्पुरती स्थगिती जाहीर केली आहे. परिस्थिती पूर्ववत होईपर्यंत ही सेवा बंद राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
आखाती युद्धाचा असाही फटका, टपाल सेवा तात्पुरती बंद, कधी सुरू होणार?
आखाती युद्धाचा असाही फटका, टपाल सेवा तात्पुरती बंद, कधी सुरू होणार?
advertisement

या निर्णयाचा पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिक, विद्यार्थी आणि व्यावसायिकांवर मोठा परिणाम झाला आहे. विशेषतः परदेशात शिक्षणासाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि नोकरीसाठी महत्त्वाची कागदपत्रे पाठवणाऱ्या उमेदवारांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेकांच्या कागदपत्रांची प्रक्रिया अडकून पडली असून, प्रवेश प्रक्रिया, व्हिसा कामकाज आणि इतर अधिकृत व्यवहारांमध्ये विलंब होत आहे. तसेच व्यावसायिक व्यवहारांसाठी आवश्यक असलेली कागदपत्रे वेळेत पोहोचत नसल्याने व्यापाऱ्यांनाही आर्थिक व प्रशासकीय अडचणी निर्माण झाल्या आहेत.

advertisement

पुणेकरांचा प्रवास सुसाट! तळेगाव-चाकण औद्योगिक पट्टा कोंडीमुक्त होणार, मास्टर प्लॅन ठरला!

टपाल सेवा तुलनेने कमी खर्चात आणि विश्वासार्ह असल्यामुळे अनेक जण या सेवेचा वापर करतात. मात्र, सेवा बंद झाल्यामुळे काहींना खासगी कुरिअर सेवांचा पर्याय निवडावा लागत आहे. या सेवांचा खर्च अधिक असल्याने नागरिकांवर आर्थिक ताणही वाढत आहे. याशिवाय सर्व भागांत खासगी कुरिअर सेवा उपलब्ध नसल्याने अनेकांना पर्यायी मार्ग शोधावा लागत आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
भारतीय स्वातंत्र्यासाठी इथं व्हायच्या बैठका, पुण्यातील ऐतिहासिक राम मंदिर, तुम्ही पाहिलंय का? Video
सर्व पहा

टपाल विभागाने स्पष्ट केले आहे की, ही बंदी तात्पुरती असून परिस्थिती स्थिर झाल्यानंतर सेवा पुन्हा सुरू करण्यात येईल. दरम्यान, ज्यांनी आधीच टपाल बुक केले आहे पण ते अद्याप पाठवले गेलेले नाही, अशा ग्राहकांना टपाल परत मागवण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यासाठी संबंधितांनी अर्ज करावा लागणार असून प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी सुमारे सात दिवसांचा कालावधी लागू शकतो. हवाई सेवा सुरळीत झाल्यानंतरच आंतरराष्ट्रीय टपाल सेवा पूर्णपणे पूर्ववत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

advertisement

मराठी बातम्या/पुणे/
आखाती युद्धाचा असाही फटका, 'ती' टपाल सेवा तात्पुरती बंद, कधी सुरू होणार?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल