नेमकं प्रकरण काय?
मिळालेल्या माहितीनुसार, अक्षय जाधव याने सायलीला गाणगापूर (कर्नाटक) येथे देवदर्शनाला जाण्याचं असल्याचं सांगून घराबाहेर नेलं होतं. २५ मार्च रोजी प्रवासादरम्यान, चारित्र्याच्या संशयावरून पती-पत्नीमध्ये जोरदार वाद झाला. हा वाद इतका टोकाला गेल्यानंतर अक्षयने भररस्त्यात गाडी थांबवली आणि सायलीला जबरदस्तीने बाहेर ओढलं. त्यानंतर त्याने तिला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली.
advertisement
मारहाणीनंतरही अक्षयचा राग शांत झाला नाही. त्याने धारदार शस्त्राने सायलीचा गळा चिरला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या सायलीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याच्या हेतूने किंवा तिला पूर्णपणे संपवण्यासाठी त्याने अंगावरून कारही घातली. या भीषण घटनेत सायलीचा जागीच मृत्यू झाला. या घटनेचा एक हृदयद्रावक व्हिडिओही सध्या समाजमाध्यमांवर व्हायरल झाले होते. यावर आता कुटुंबीयांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.
सायलीला पैशांसाठी वारंवार त्रास
“आमच्या मुलीला तिचा पती पैशासाठी वारंवार त्रास देत होता. घर बांधणे आणि वाहन खरेदीसाठी माहेरहून पैसे आणण्याचा दबाव टाकत होता. यासाठी तो तिला मारहाण करत असे” असा आरोप सायलीच्या कुटुंबीयांनी केला आहे.
आम्हाला सायलीची बॉडीही आणता आली नाही
सायलीची आत्या रोहिणी यांनी सांगितलं की, १५ दिवसात अक्षयने तिची वाट लावली, १६ व्या दिवशी आळंदीला लव्ह मॅरेज केलं. आम्हाला माहितीही नव्हतं. तिच्यावर पैशासाठी सतत दबाव टाकायचा. सायलीवर नाही नाही ते आळ लावले. घटनेच्या आदल्या दिवशी त्याने मला फोन केला. मला म्हणाला की तिला सांगा, भांडणं विसरुन परत येण्यासाठी. नंतर काय बोलणं झालं माहिती नाही, पण बँकेत जाते म्हणून ती गेली. गुरुवारी चार वाजता त्याने सायलीला मारली. आम्हाला बॉडीही आणता आली नाही. मला तिला हातही लावता आला नाही, इतकी मी कमनशिबी ठरले, असं आत्याने सांगितलं.
