नेमका निर्णय कोणता?
आई एकवीरा देवीचा पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर लोणावळा ग्रामीण पोलिस ठाण्यात मानाच्या पालख्यांचे प्रमुख आणि पदाधिकाऱ्यांची नियोजन बैठक पार पडली. या बैठकीत अनेक प्रतिनिधी उपस्थित होते. ज्यातमध्ये पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्गावरील टोल नाक्यांवर टोलमाफी देण्यात येणार असा निर्णय घेण्यात आलेला आहे.
चैत्री यात्रेदरम्यान 24 मार्च रोजी श्री कालभैरवनाथ देवाची पालखी, 25 मार्च रोजी आई एकवीरा देवीची मुख्य पालखी, 26 मार्च रोजी देवीचा तेलवान आणि मानपान कार्यक्रम होणार आहे तसेच 2 एप्रिल रोजी श्री ढाक कालभैरव आणि भैरवनाथ यांच्या पालखी सोहळ्यांचे आयोजन करण्यात आले आहे.
advertisement
गडावर उसळणार भक्तांचा जनसागर
या यात्रेला हजारो भाविक मुंबई, ठाणे, रायगड, नवी मुंबई आणि कोकण किनारपट्टी भागातून मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. यात्रेदरम्यान मोठी गर्दी होण्याची शक्यता असल्याने पायथा ते कार्ला गड परिसरात कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.
दरम्यान गडावर स्वच्छता राखावी, फटाके वाजवू नयेत तसेच पालख्या दुपारी 1 वाजण्यापूर्वी गडावर आणाव्यात असे आवाहन प्रशासनाने केले आहे. यात्रेला शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी भाविकांनी सहकार्य करावे असेही आवाहन करण्यात आले आहे.
