जालन्यात एक दिवसाच्या पावसाने व्यवसायिकांना रडवलं, लाखोंच्या मुद्देमालांचा...
सोने आणि चांदीच्या आभूषणांना मुलामा देण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या पिढीचे काम करीन उस्मान गिल्डर, हमीद उस्मान गिल्डर आणि रहीम उस्मान गिल्डर हे पाहत आहेत. या पेढी ची सुरुवात 1905 मध्ये हयात गिल्डर यांनी केली. त्यांचा हा पिढीजात व्यवसाय केवळ दागिने तयार करण्यापुरता मर्यादित नाही, तर गणपती बाप्पा आणि देवींचे अलंकार तयार करण्यामध्येही गिल्डर कुटुंबाने आपला ठसा उमटवला आहे. विशेष म्हणजे, प्रत्येक अलंकार घडवताना त्यातील कलात्मकता आणि बारकावे यांना जपणे, तसेच त्याला झगमगाटी चकाकी देणे, ही त्यांची खासियत आहे.
advertisement
नवरात्रीमध्ये 9 दिवस, 9 रंगच का असतात? तुम्हाला माहितीये का खरं कारण?
गणेशोत्सव आणि नवरात्रीच्या काळात पुण्यातील अनेक मानाचे गणपती व देवींच्या मुर्तींची शोभा वाढवणारे अलंकार याच कुटुंबाच्या हातातून घडलेले आहेत. पारंपरिक पद्धतीला आधुनिकतेची जोड देत त्यांनी दागिन्यांच्या कामामध्ये सातत्याने नव्या पिढीला सामील करून घेतले आहे. त्यामुळेच गिल्डर कुटुंबाच्या हातातील सोन्या-चांदीच्या अलंकारांना वेगळीच ओळख प्राप्त झाली आहे. रहीम उस्मान शेख सांगतात, “आमचं काम हे फक्त व्यवसाय नाही, तर ही आमच्या पिढ्यांची परंपरा आहे. भक्तांच्या देवाला आम्ही बनवलेले अलंकार घालून त्याची शोभा वाढते, हेच आमच्यासाठी खऱ्या अर्थाने समाधान आहे.”
'पोलिस पाटील' पदासाठी बंपर भरती, शेवटची तारीख आली जवळ; लवकरात लवकर करा अर्ज
आजही रविवार पेठेत गिल्डर बंधूंची कारागिरी पाहण्यासाठी अनेक ग्राहक भेट देतात. या कारागिरीला मिळणारा विश्वास आणि मान हेच या १२० वर्षांच्या प्रवासाचे खरे बळ आहे.