पुढे बोलताना त्यांनी फडणवीस यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. माझा राजकीय मार्ग नसल्याने मी माझ्या मराठा आरक्षणाच्या ध्येयावर ठाम आहे. मात्र हे खरं आहे या सरकारने मला खूप त्रास दिला आहे. ज्याप्रकारे उपमुख्यमंत्री यांनी खोटे गुन्हे दाखल केले आहेत, आणि आम्हाला फसवण्याचा प्रयत्न केला आहे, ते त्यांना या निवडणुकीत खूप जड जाणार आहे, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी दिला.
advertisement
दरम्यान समाज हुशार आहे. मात्र माझा नाईलाज आहे. निवडणुकी सारखी कुठलीही गोष्ट करताना विचारपूर्वक करायला हवी. सात महिन्यात मी एकही गृहमंत्री आणि सरकारचा डाव यशस्वी होऊ दिला नाही, त्यांचा डाव यशस्वी झाला असता तर मीच समाज एकत्र केला आणि मीच समाजाला मातीत घातलं असं झालं असतं. जर राज्यातील सरकारने आम्हाला सहा जूनपर्यंत आरक्षण नाही दिलं तर विधानसभा निवडणुकीला संपूर्ण महाराष्ट्र काबीज करणार असा इशारा देखील यावेळी मनोज जरागे पाटील यांनी सरकारला दिला आहे.
