जळगाव, जालना, बीड, लातूर, धाराशिव या जिल्ह्यांत 25 एप्रिलला उष्ण आणि दमट वातावरण असण्याची शक्यता आहे. सोलापूर, परभणी, हिंगोली, नांदेड, अकोला, अमरावती, चंद्रपूर, नागपूर या जिल्ह्यांना 25 एप्रिल साठी हीट वेव्हचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. सांगली, सोलापूर, बीड, लातूर, धाराशिव या ठिकाणी 25 एप्रिलला संध्याकाळच्या वेळी विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाची शक्यता असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.
advertisement
मुंबईतील कमाल तापमान 33 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 24 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. त्याठिकाणी 25 एप्रिलला मुख्यतः निरभ्र आकाश असू शकते. 25 एप्रिलला पुण्यातील कमाल तापमान 40 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 23 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. त्याठिकाणी मुख्यतः निरभ्र आकाश असू शकते.
छत्रपती संभाजीनगरमधील कमाल तापमान 43 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 25 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. 25 एप्रिलला त्याठिकाणी मुख्यतः निरभ्र आकाश असू शकते. नाशिकमधील कमाल तापमान 40 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 22 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. त्याठिकाणी मुख्यतः निरभ्र आकाश असू शकते.
नागपूरमधील कमाल तापमान 45 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 22 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. नागपूर मध्ये हीट वेव्ह कायम आहे. त्यामुळे नागरिकांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.
एकंदरीत राज्यातील तापमान आणि हवामानाची स्थिती बघता असे लक्षात येते की, राज्यात संमिश्र वातावरण तयार होत आहे. त्याचबरोबर उन्हाचा कडाका जास्त आहे. त्यामुळे नागरिकांनी आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. भरपूर पाणी प्यावे. दुपारच्या वेळी उन्हात बाहेर पडणे टाळावे, असे वारंवार आरोग्य विभागाकडून नागरिकांना सांगण्यात येत आहे.





