राज्यात गेल्या काही दिवसांपासून तापमान चांगलेच वाढले होते. मात्र, अचानक बदललेल्या वातावरणामुळे आता काही भागांमध्ये उष्णतेचा जोर कमी झाल्याचं जाणवत आहे. तापमानात घसरण झाल्यामुळे उन्हाचा चटका काहीसा कमी झाला असला तरीही वाऱ्याचा वेग आणि विजांचा कडकडाट मात्र काळजीचं कारण ठरत आहे.
शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी! मे महिन्यात लावा वांग्याचे 'हे' वाण; फक्त 60 दिवसांत कराल लाखोंची कमाई
advertisement
हवामान विभागाने राज्यातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वाशिम आणि यवतमाळ या 18 जिल्ह्यांसाठी पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे.
या भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस, काही ठिकाणी वादळी वाऱ्यांचा जोर आणि विजांचा गडगडाट होण्याची शक्यता आहे. राज्यातील तापमान सध्या 31 ते 41 अंश सेल्सिअस दरम्यान असल्याचे दिसून येत आहे.
राज्यात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे. मराठवाडा आणि विदर्भात मात्र पावसाचा जोर अधिक असू शकतो. दुपारनंतर व संध्याकाळच्या सुमारास अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार सरी पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
विजांचा कडकडाट होत असताना उघड्यावर थांबू नका. झाडाखाली किंवा विजेच्या खांबाजवळ उभे राहण्याचे टाळा.
शेतीकाम करत असताना हवामान विभागाच्या सूचना लक्षात घ्या आणि त्याचबरोबर गरज असल्यास सुरक्षित ठिकाणी आसरा घ्या, असे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे. वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता असल्यानं शेतकऱ्यांनी पिकांची योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे.





