पुणेकरांचा मुख्य जलस्रोत असलेले खडकवासला धरण सध्या 59.60 टक्के भरले आहे. या धरणाची एकूण साठवण क्षमता 86 दशलक्ष घनमीटर आहे. यातील सध्या 63.32 दशलक्ष घनमीटर पाणी साठा झालेला आहे. खडकवासला हे शहरातील पाणीपुरवठ्यासाठी अत्यंत महत्त्वाचे धरण असल्याने हा साठा दिलासादायक मानला जातो.
Water Scarcity Jalna: इतकं पावसाचं पाणी गेलं कुठे? जालन्यात फक्त 7 टक्के एवढाच पाणीसाठा शिल्लक
advertisement
मुळशी तालुक्यातील टेमघर धरणाची एकूण क्षमता 3.812 अब्ज घनफूट (टीएमसी) आहे. सध्या या धरणात 73.77 दशलक्ष घनमीटर पाणी असून, ते 67.44 टक्के भरले आहे.
पानशेत धरणाची एकूण साठवण क्षमता 225.77 दशलक्ष घनमीटर आहे, ते 71.87 टक्के भरले आहे. हे धरण पावसाळ्यात पाणी साठवणीत महत्त्वाचे मानले जाते.
याशिवाय, वरसगाव धरण हे मुळशी नदीवर बांधलेले असून त्याची एकूण साठवण क्षमता 293.06 दशलक्ष घनमीटर आहे. हे धरण सध्या 77.34 टक्के भरले आहे, जे सर्व धरणांमध्ये सर्वाधिक भरलेले आहे.
एकूणच, सध्या पुण्यातील सर्वच प्रमुख धरणांमध्ये समाधानकारक जलसाठा आहे. अजून काही दिवस पावसाचा जोर कायम राहिल्यास आगामी काही महिन्यांसाठी शहराचा पाणीपुरवठा सुरळीत राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पावसाळ्याचे अजून दोन महिने बाकी असल्याने धरणे लवकरच पूर्ण क्षमतेने भरतील, अशी माहिती पाटबंधारे विभागाने दिली आहे.