वरंध घाट हा भाग दरडप्रवण असून येथे रस्ता अत्यंत अरुंद आणि धोकादायक वळणांचा आहे. एका बाजूला नीरा देवघर धरणाचे पाणी आणि दुसऱ्या बाजूला उंच डोंगर असल्याने कामादरम्यान वाहतूक वळवण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध नाही. आगामी पावसाळा लक्षात घेता, घाटातील अवघड कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे. कार्यकारी अभियंता आणि उपविभागीय अधिकारी यांच्या अहवालानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी हा रस्ता बंद करण्याचे आदेश दिले आहेत.
advertisement
प्रवाशांसाठी पर्यायी मार्ग कोणते?
घाटाचे काम सुरू असताना प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून प्रशासनाने पर्यायी मार्ग सुचवले आहेत. यात पुण्याकडे जाण्यासाठी: माणगाव - निजामपूर - ताम्हिणी घाट - मुळशी - पिरंगुट - पुणे. कोल्हापूर/सातारा बाजूकडे जाण्यासाठी: पोलादपूर - महाबेश्वर - वाई - सातारा किंवा पोलादपूर - खेड - चिपळूण - पाटण मार्गे जाता येणार आहे.
स्थानिक ग्रामस्थांच्या दैनंदिन गरजा लक्षात घेऊन धामणदेव, हिर्डोशी, शिळीम यांसारख्या गावांच्या भागात आवश्यक तिथे मर्यादित स्वरूपात पर्यायी व्यवस्था केली जाणार असल्याचे पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
