जळगाव, अहिल्यानागर, पुणे, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, अकोला या जिल्ह्यांना उष्णतेचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. याठिकाणी उष्ण आणि दमट वातावरण असण्याची शक्यता असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.
विदर्भातील अमरावती, चंद्रपूर, नागपूर, वर्धा, अकोला या जिल्ह्यांत 24 एप्रिलसाठी हीट वेव्हचा इशारा देण्यात आला आहे. त्याचबरोबर अकोला वगळता सर्व जिल्ह्यांना उष्णतेचा ऑरेंज अलर्ट सुद्धा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.
advertisement
24 एप्रिलला मुंबईतील कमाल तापमान 34 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. तर किमान तापमान 25 अंश सेल्सिअस इतके असू शकते. त्याठिकाणी मुख्यतः निरभ्र आकाश असल्याने उन्हाचा त्रास नागरिकांना जास्त होऊ शकतो. पुण्यातील कमाल तापमान 40 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 23 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. 24 एप्रिलला त्याठिकाणी मुख्यतः निरभ्र आकाश असू शकते.
Lemon Rate : उन्हाळ्यात आता लींबू पाणी विसरा, 2 रुपयाच्या लिंबाची 7 रुपये किंमत, कारण काय?
छत्रपती संभाजीनगरमधील कमाल तापमान 42 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 25 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. त्याठिकाणी मुख्यतः निरभ्र आकाश असू शकते. 24 एप्रिलला नाशिकमधील कमाल तापमान 41 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 22 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. त्याठिकाणी मुख्यतः निरभ्र आकाश असू शकते.
नागपूरमधील कमाल तापमान 45 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 24 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. नागपूरमध्ये 24 एप्रिलला हीट वेव्हचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.
एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासूनच राज्यातील तापमानात वाढ बघायला मिळत आहे. सद्यस्थितीत राज्यातील तापमान 34 ते 45 अंश सेल्सिअस दरम्यान आहे. त्याचबरोबर विविध ठिकाणी उष्ण आणि दमट वातावरण निर्माण झाल्याचे देखील दिसून येत आहे. तर विदर्भात उष्णतेची लाट असल्याचे देखील बघायला मिळत आहे. त्यामुळे नागरिकांनी दुपारच्या वेळी बाहेर पडणे टाळावे. भरपूर पाणी प्यावे आणि आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.





