मूर्तिपूजा म्हणजे काय?
मूर्तिपूजा म्हणजे, संन्यास स्वीकारणाऱ्या व्यक्तींची एक भव्य मिरवणूक काढली जाते. त्यांना मूर्तीसमान मानलं जातं आणि त्यांची पूजा केली जाते. या सोहळ्यात नागरिक, त्यांचे शेजारी आणि अगदी अपरिचित लोकही येतात. सर्व नातेवाईक या कार्यक्रमाला उपस्थित राहून त्यांना अखेरचा निरोप देतात.
संन्यासातच जीवनाचं खरं सुख
जीवनातील सर्व बंधनातून मुक्ती मिळते म्हणून संन्यासातच जीवनाचं खरं सुख आहे, असं या दोघी तरुणींनी यावेळी सांगितलं. सामाजिक सेवा आणि धार्मिक सेवेतून त्यांना परम सत्य आणि आनंद मिळेल, म्हणूनच त्या संन्यास घेत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
advertisement
ऐषोआरामी जीवनाचा अंत
या तरुणींना 17 नोव्हेंबर रोजी झारखंडमध्ये परम पूज्य आचार्य श्री मुक्तिप्रभु सुरेश्वरजी महाराज यांच्या निवासस्थानी आणि परम पूज्य साध्वी श्री पूर्णप्रज्ञाश्रीजी महाराज साहेब यांच्या उपस्थितीत रुजुबालिका तीर्थक्षेत्रात जैन संन्यासाची दीक्षा मिळणार आहे. जैन संन्यास घेतल्यानंतर त्या आपली रोजची कपडे सोडून पांढरी वस्त्रं परिधान करतील आणि धर्मप्रचार करतील. एकदा संन्यासाची दीक्षा घेतली की त्यांच्या ऐषोआरामी जीवनाचा तिथेच अंत होतो. पाऊस, थंडी किंवा ऊन याची पर्वा न करता त्या फिरतील आणि धर्मप्रसार करतील. त्या समाजाला धर्म शिकवतील आणि तिथेच त्या परम सत्याचा शोध घेतील.
आई-वडिलांनाही झाला आनंद
आई-वडिलांना आपल्या मुला-मुलींची लग्न होऊन नातवंडं पाहायला आवडतात. पण या तरुणींनी संन्यासी होण्याचा निर्णय घेतला आहे. मुलांच्या या निर्णयाला आई-वडिलांनी विरोध केलेला नाही किंवा त्यांना याचं दुःखही झालेलं नाही. दीक्षा घेण्यासाठी जेव्हा त्या जातील, तेव्हा त्यांनी आनंदाने स्वीकारलं पाहिजे. आणि आई-वडील आणि कुटुंबानेही त्यांना आनंदाने निरोप दिला पाहिजे. तेव्हाच संन्यासाला अर्थ आहे, असं त्यांना वाटतं. मात्र, जीवनाचा अनुभव घेण्याच्या टप्प्यावर घेतलेल्या या निर्णयाने सगळ्यांनाच आश्चर्य वाटलं आहे. राजघराण्यात जन्माला येऊन सर्वस्वाचा त्याग करणारे भगवान महावीर यांनी संन्यास घेऊन धर्मप्रचार केला, त्याच मार्गावर या दोन तरुणीही निघाल्या आहेत, हे खरंच आश्चर्यकारक आहे.
हे ही वाचा : बाप रे! पोटात हे काय सापडलं? 'ही' महिला खात होती स्वतःचेच केस; जेव्हा त्रास असह्य झाला...
हे ही वाचा : 76 वर्षे झाली, या मंदिरात कधीच चुकली नाही 'महात्मा गांधी'ची पूजा; दिवसातून तीन वेळा आरती!
