सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव
अनेकदा आपण मंदिरात जातो. मोठ्या श्रद्धेने देवाचे दर्शन घेतो आणि मनातील इच्छा पूर्ण व्हाव्यात म्हणून प्रार्थना करतो. मंदिराची रचना ही अशा ठिकाणी केलेली असते जिथे पृथ्वीच्या चुंबकीय लहरी अत्यंत सक्रिय असतात. मूर्तीच्या खाली बसवलेला तांब्याचा तुकडा ही ऊर्जा खेचून घेतो. जेव्हा आपण दर्शन घेऊन गाभाऱ्याबाहेर येतो, तेव्हा आपल्या शरीरात एक विशिष्ट प्रकारची कंपने निर्माण झालेली असतात. जर आपण लगेच बाहेर पडून संसारी गजबजाटात गेलो, तर ती ऊर्जा टिकत नाही. मंदिरात बसल्यामुळे ती साठवलेली सकारात्मक ऊर्जा आपल्या शरीरातील 'चक्रांना' संतुलित करते आणि मन शांत होण्यास मदत होते.
advertisement
आत्मचिंतनाची संधी
मंदिराच्या पायऱ्या किंवा आवार हा एक 'सेतू' मानला जातो, जो आध्यात्मिक जग आणि भौतिक जग यांना जोडतो. दर्शन घेतल्यावर जेव्हा आपण शांत बसतो, तेव्हा आपल्या मनातील कोलाहल थांबतो. त्या 3-5 मिनिटांच्या शांततेत आपण आपल्या कृतींचे आत्मपरीक्षण करू शकतो. समस्यांवर सकारात्मक दृष्टीने विचार करण्याची शक्ती तेव्हाच प्राप्त होते जेव्हा मन स्थिर असते.
'या' एका श्लोकाचे पठण
शास्त्रात असे सांगितले आहे की, मंदिरात बसून केवळ जगाच्या गप्पा मारू नयेत, तर एक विशेष श्लोक म्हणावा. ज्याला आपण 'प्रार्थना' म्हणतो.
"अनायासेन मरणं, विनादैन्येन जीवनम् ।
देहान्ते तव सान्निध्यं, देहि मे परमेश्वरम् ॥"
ज्याचा अर्थ "हे ईश्वरा, मला त्रास न होता मृत्यू दे, माझे जीवन परावलंबी नसावे आणि मृत्यूसमयी तुझे सान्निध्य लाभावे." हे मागणे मागण्यासाठी आणि देवाची मूर्ती नजरेत साठवण्यासाठी तिथे बसणे अनिवार्य मानले गेले आहे.
टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
