वास्तुशास्त्रानुसार पाणी ठेवण्याची योग्य जागा -
वास्तुशास्त्रानुसार घराच्या ईशान्य दिशेला पाण्याची टाकी ठेवणे शुभ मानले जाते. मान्यतेनुसार, या स्थितीत पाणी ठेवल्यानं चांगली संपत्ती मिळते. याशिवाय घरात प्रगती आणि समृद्धीही येते. उत्तर दिशेला पाण्याची टाकी किंवा पिण्याचे पाणी ठेवल्यास घरात सुख-शांती वाढते. पाण्याची टाकी उत्तर आणि ईशान्य दिशेला ठेवल्याने कुटुंबातील सदस्यांची आर्थिक स्थिती सुधारते. यासोबतच घरातील वातावरण शांत राहते.
advertisement
शुक्र-चंद्राच्या मिलनानं कलात्मक राजयोग! या राशीच्या लोकांचे उजळणार भाग्य
या दिशांना पाणी ठेवू नये -
वास्तुशास्त्रात असे सांगितले आहे की, आग्नेय दिशा पाण्याची टाकी किंवा पाण्याचे ठिकाण बनवण्यासाठी अजिबात योग्य नाही. ही दिशा अग्नीची दिशा मानली जाते, अग्नी आणि पाणी यांच्या संयोगाने गंभीर वास्तुदोष निर्माण होऊ शकतात. घराच्या दक्षिण दिशेला पाण्याची टाकी किंवा भूमिगत टाकी नसावी. यामुळे कुटुंबात अस्वस्थता आणि अनपेक्षित नुकसान होते.
- वास्तुशास्त्रानुसार दक्षिण-पश्चिम दिशेला म्हणजेच नैऋत्य कोपऱ्यात पाण्याची टाकी नसावी. या ठिकाणी पाणी असल्याने घरातील लोकांना आजार होतात, तसेच कर्जही वाढते. अशा घरात राहणाऱ्या लोकांना मानसिक आजारही होऊ शकतात.
प्रपोज करण्यात पटाईत असतात या जन्मतारखांचे लोक! घरीही बिनधास्त सांगतात
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
