TRENDING:

ना राहुल, ना पंत... Asia Cup साठी टीम इंडियात होणार 2 नव्या विकेट कीपरची एन्ट्री!

Last Updated:

आशिया कपसाठी टीम इंडियाची निवड मंगळवारी मुंबईमध्ये होणार आहे. अजित आगरकर यांच्या नेतृत्वातल्या निवड समितीची बैठक मंगळवारी झाल्यानंतर टीम जाहीर केली जाईल.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : आशिया कपसाठी टीम इंडियाची निवड मंगळवारी मुंबईमध्ये होणार आहे. अजित आगरकर यांच्या नेतृत्वातल्या निवड समितीची बैठक मंगळवारी झाल्यानंतर टीम जाहीर केली जाईल. आशिया कपसाठी कर्णधार सूर्यकुमार यादव पूर्णपणे फिट झाला आहे, तर जसप्रीत बुमराहने देखील आपण आशिया कपसाठी उपलब्ध असल्याचं बीसीसीआयला कळवलं आहे. यंदाचा आशिया कप टी-20 फॉरमॅटमध्ये खेळवला जाणार असून 8 टीम सहभागी होणार आहेत. 9 सप्टेंबर ते 28 सप्टेंबरदरम्यान दुबई आणि अबु धाबीमध्ये स्पर्धेचं आयोजन केलं जाणार आहे.
ना राहुल, ना पंत... Asia Cup साठी टीम इंडियात होणार 2 नव्या विकेट कीपरची एन्ट्री!
ना राहुल, ना पंत... Asia Cup साठी टीम इंडियात होणार 2 नव्या विकेट कीपरची एन्ट्री!
advertisement

आशिया कपमध्ये विकेट कीपर म्हणून केएल राहुल आणि ऋषभ पंत यांची निवड व्हायची शक्यता कमी आहे. नुकत्याच झालेल्या इंग्लंड दौऱ्यातील टेस्ट सीरिजमध्ये राहुल आणि पंत यांनी उत्कृष्ट कामगिरी केली होती, पण टी-20 फॉरमॅटमध्ये या दोघांनाही वगळलं जाणार असल्याचं बोललं जातंय. इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या टेस्टमध्ये पंतच्या पायाला दुखापत झाली होती, त्यामुळे तो फिट नाहीये. तर केएल राहुल मागच्या बऱ्याच काळापासून भारताकडून टी-20 क्रिकेट खेळलेला नाही.

advertisement

संजू सॅमसन पहिली पसंत

स्पोर्ट्स स्टारने दिलेल्या वृत्तानुसार संजू सॅमसन हा आशिया कपसाठी विकेट कीपर म्हणून पहिली पसंती असेल, तर जितेश शर्मा याची बॅकअप विकेट कीपर म्हणून निवड केली जाईल. आयपीएल 2025 मध्ये जितेश शर्माने धमाकेदार कामगिरी केली होती. आरसीबीला आयपीएल ट्रॉफी जिंकवण्यातही जितेश शर्माने महत्त्वाची भूमिका बजावली. जितेश शर्माने भारताकडून 9 आंतरराष्ट्रीय टी-20 सामने खेळले, यात त्याने 100 रन केल्या आहेत. 14 जानेवारी 2024 ला जितेश शर्मा अफगाणिस्तानविरुद्ध शेवटची टी-20 आंतरराष्ट्रीय मॅच खेळला होता.

advertisement

दुसरीकडे 33 वर्षांचा केएल राहुल हा वनडे क्रिकेटमध्ये विकेट कीपर म्हणून पहिली पसंत आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताला जिंकवण्यातही केएल राहुलचा महत्त्वाचा वाटा होता, पण केएल राहुल टीम इंडियाच्या टी-20 प्लानमधून बाहेर आहे. केएल राहुल हा टी-20 आंतरराष्ट्रीयमध्ये भारताकडून 2 हजार रन करणाऱ्या 4 खेळाडूंपैकी एक आहे. केएल राहुलने शेवटची आंतरराष्ट्रीय टी-20 मॅच 10 नोव्हेंबर 2022 ला इंग्लंडविरुद्ध ऍडलेडमध्ये खेळली होती.

advertisement

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
ना राहुल, ना पंत... Asia Cup साठी टीम इंडियात होणार 2 नव्या विकेट कीपरची एन्ट्री!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल