TRENDING:

IND vs PAK पुन्हा भिडणार,7 दिवसातच हायव्होल्टेज लढत, पाहा कधी, कुठे, केव्हा?

Last Updated:

टीम इंडियाने पाकिस्तानला पराभूत केलं होतं. यानंतर आता आशिया कप संपुष्टात आला आहे.पण तरी देखील पुन्हा भारत पाकिस्तान आमने सामने येणार आहे. आणि या दोन कट्टर प्रतिस्पर्धी संघांमध्ये हायव्होल्टेज सामने पाहायला मिळणार आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
India vs Pakistan News : आशिया कपच्या फायनल सामन्यात भारताने कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा 5 विकेट राखून पराभव केला होता. हा विजय टीम इंडियासाठी खूप महत्वाचा आहे.कारण स्पर्धेत हॅन्डशेक आणि वादग्रस्त सेलिब्रेशनवरून प्रचंड वाद पेटला होता. या वादानंतर टीम इंडियाने पाकिस्तानला पराभूत केलं होतं. यानंतर आता आशिया कप संपुष्टात आला आहे.पण तरी देखील पुन्हा भारत पाकिस्तान आमने सामने येणार आहे. आणि या दोन कट्टर प्रतिस्पर्धी संघांमध्ये हायव्होल्टेज सामने पाहायला मिळणार आहेत.
ind vs pak
ind vs pak
advertisement

खरं तर आशिया कप संपल्यानंतर लगेचच आयसीसीच्या वुमेन्स वर्ल्डकपला सूरूवात होणार आहे. ही स्पर्धेा उद्या 30 सप्टेंबरपासून सूरू होत आहे. या स्पर्धेत भारताचा महिला संघाचा पहिला सामना हा श्रीलंकेविरूद्ध रंगणार आहे. हा सामना उद्या असणार असून या सामन्याला दुपारी 3 वाजता सूरूवात होणार आहे. या सामन्यानंतर टीम इंडिया थेट 5 ऑक्टोबर 2025 ला थेट पाकिस्तानशी भिडणार आहे. कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडिअममध्ये हा सामना रंगणार आहे. या सामन्याला दुपारी 3 वाजता सूरूवात होणार आहे. खरं तर भारत पाकिस्तान मधील आशिया कपमधील फायनल नंतर बरोबर 7 दिवसांनी ही लढत होणार आहे.त्यामुळे क्रिकेट फॅन्सला हायव्होल्टेज लढत पाहायला मिळणार आहे.

advertisement

दरम्यान आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषकाचे 13वे पर्व 30सप्टेंबर रोजी अधिकृतपणे सुरू होईल, भारत आणि श्रीलंका एकत्रितपणे या स्पर्धेचे आयोजन करतील. यजमान म्हणून भारताची ही चौथी वेळ आहे, कारण त्यांनी दोनदा ट्रॉफी जिंकण्याच्या जवळ पोहोचले होते. त्यांचा सर्वात अलीकडील विजय 2017 मध्ये होता, जेव्हा मिताली राजने संघाला एका तणावपूर्ण अंतिम फेरीत नेले होते ज्याचा शेवट लॉर्ड्सवर इंग्लंडविरुद्ध झाला होता.

advertisement

आठ संघ, 31सामने आणि 34दिवसांचे सामने

३४ दिवसांत एकूण ३१ सामने खेळले जातील. ही स्पर्धा मंगळवार, ३० सप्टेंबर रोजी सुरू होईल आणि रविवार, २ नोव्हेंबर रोजी अंतिम सामन्याने संपेल. बहुतेक सामने भारतीय वेळेनुसार दुपारी ३ वाजता सुरू होतील, २६ ऑक्टोबर रोजी न्यूझीलंड विरुद्ध इंग्लंड सामना वगळता, जो भारतीय वेळेनुसार सकाळी ११ वाजता सुरू होईल. यजमान म्हणून भारत आपोआप पात्र ठरतो आणि महिला चॅम्पियनशिप रँकिंगमधून ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, इंग्लंड, श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिका त्यांच्यासोबत येतील. लाहोरमधील विश्वचषक पात्रता फेरीतून पाकिस्तान आणि बांगलादेशने आपले स्थान मिळवले.

advertisement

भारताचा महिला संघ : हरमनप्रीत कौर (कर्णधार),स्मृती मानधना (उपकर्णधार),प्रतिका रावल, हरलीन देओल, जेमिमा रॉड्रिग्ज, रिचा घोष, उमा छेत्री, रेणुका सिंग ठाकूर, दीप्ती शर्मा, स्नेह राणा, श्री चरणी, राधा यादव, अमनजोत कौर, अरुंधती रेड्डी, क्रांती गौड राखीव संघ: तेजल हसबनीस, प्रेमा रावत, प्रिया मिश्रा, मिन्नू मणी, सायली सतघरे

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs PAK पुन्हा भिडणार,7 दिवसातच हायव्होल्टेज लढत, पाहा कधी, कुठे, केव्हा?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल