पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारताने पहिले बॅटिंग करताना 46.1 ओव्हरमध्ये 240 रन केल्या, ज्यामध्ये आरोन जॉर्जने 85 रनची खेळी केली. कर्णधार आयुष म्हात्रे (38) आणि चौहान (46) यांनीही उपयुक्त योगदान दिले. 241 रनच्या लक्ष्याचा पाठलाग करताना, पाकिस्तान सुरुवातीच्या अपयशातून सावरला नाही आणि 41.2 ओव्हरमध्ये 150 रनवरच त्यांचा ऑलआऊट झाला.
भारताची सुरुवात चांगली झाली, कर्णधार म्हात्रेने 25 बॉलच्या इनिंगमध्ये चार पोर आणि तीन सिक्स मारले. पण, मोहम्मद सय्यमने पहिल्या 10 ओव्हरमध्ये दोन्ही ओपनरना आऊट केले. त्यानंतर जॉर्जने डाव सावरला. पाकिस्तानकडून सय्यमने 67 रनमध्ये तीन बळी घेतले, अब्दुल सुभानने 42 रनमध्ये तीन विकेट घेतल्या, तर निकब शफीकला 2 विकेट मिळाल्या.
advertisement
पाकिस्तानी बॅटिंगची खराब सुरूवात
पाकिस्तानच्या डावाची सुरुवात खराब झाली, 30 रनमध्येच त्यांनी चार विकेट गमावल्या, ज्यात देवेंद्रनच्या सुरुवातीच्या स्पेलमध्ये तीन बळींचा समावेश होता. कर्णधार फरहान युसूफ (23) आणि हुजैफा अहसान यांनी डाव स्थिर करण्याचा प्रयत्न केला, पण चौहानच्या तीक्ष्ण ऑफ-स्पिनने भागीदारी मोडली. अहसानने 83 बॉलमध्ये 70 रन करून पाकिस्तानकडून सर्वाधिक रन काढल्या, पण दुसऱ्या बाजूने त्याला कोणतीही साथ मिळाली नाही.
