'आशा आहे की इडन गार्डनमध्ये झालेल्या पराभवानंतर त्यांचे डोळे उघडतील जे स्थानिक क्रिकेटमध्ये मोठा स्कोअर करणाऱ्या बॅटरकडे पाहतात, जे बॉल खाली राहणाऱ्या आणि स्पिन होणाऱ्या खेळपट्टीवर खेळतात. आंतरराष्ट्रीय खेळाडू परदेशात खेळण्यात इतके व्यस्त असतात की ते घरच्या खेळपट्ट्यांवर खेळण्याचा सराव करत नाहीत. देशांतर्गत क्रिकेट खेळलात तर चांगल्या स्थितीमध्ये राहाल आणि स्पिन बॉलिंग खेळण्याचं तुमचं कौशल्यही सुधारेल', असं गावसकर म्हणाले आहेत.
advertisement
'आमचे बरेच खेळाडू देशांतर्गत क्रिकेट खेळत नाहीत. जर तुम्ही देशांतर्गत क्रिकेट खेळलात तर तुम्हाला अशा खेळपट्ट्यांवर खेळण्याची संधी मिळेल का? आता, देशांतर्गत पातळीवरही, नॉकआऊटमध्ये क्वालिफाय होण्यासाठी पॉईंट्स मिळविण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा खेळपट्टीवर बॉल थांबून येतो तसंच स्पिन होतो, पण आमचे खेळाडू देशांतर्गत क्रिकेट खेळत नाहीत. आमचे किती खेळाडू रणजी ट्रॉफी खेळतात?' असा सवाल गावसकरांनी विचारला आहे.
