सुपरस्टारची स्वार्थी बॅटिंग
मागच्या सामन्यात पहिल्याच बॉलला शून्यवर आऊट झालेल्या शुभमन गिलने या सामन्यात 28 रनची खेळी केली, पण यासाठी त्याने तब्बल 28 बॉल खेळले. 28 रनच्या या खेळीमध्ये गिलने 5 फोर मारल्या, म्हणजेच उरलेल्या 8 रन काढण्यासाठी गिलने 23 बॉल खर्च केले. मागच्या 18 इनिंगमध्ये शुभमन गिलला टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात अर्धशतकही करता आलेलं नाही, त्यामुळे त्याचं टीम इंडियातलं स्थान धोक्यात आलं आहे.
advertisement
गिलला वारंवार संधी मिळत असल्यामुळे संजू सॅमसनला बेंचवर बसावं लागत आहे, तर यशस्वी जयस्वालही टीमबाहेर आहे, त्यामुळे शुभमन गिलने स्वत:चं टीममधलं स्थान वाचवण्यासाठी एवढी संथ खेळी केली का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात भारतात टी-20 वर्ल्ड कप होणार आहे, त्याआधी टीम इंडियाच्या आता फक्त 7 टी-20 मॅच उरल्या आहेत, त्यामुळे गिलचं फॉर्ममध्ये येणं टीम इंडियासाठी गरजेचं आहे.
बॉलिंगमध्ये टीम इंडियाचा धमाका
मागच्या सामन्यात 200 पेक्षा जास्त रन दिल्यानंतर टीम इंडियाच्या बॉलरनी या सामन्यात उल्लेखनीय कामगिरी केली. बुमराहच्या गैरहजेरीमध्येही भारताने दक्षिण आफ्रिकेला 117 रनवर ऑलआऊट केलं. अर्शदीप सिंग, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी 2-2 विकेट घेतल्या. तर हार्दिक पांड्या आणि शिवम दुबे यांना 1-1 विकेट घेण्यात यश आलं. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडन मार्करमने सर्वाधिक 61 रन केले. 4 ओव्हरमध्ये फक्त 13 रन देऊन 2 विकेट घेणाऱ्या अर्शदीप सिंगला प्लेअर ऑफ द मॅच देऊन गौरवण्यात आलं.
