महेला जयवर्धने यांनी सांगितले आहे की ते लिलावात अनकॅप्ड देशांतर्गत खेळाडूंवर देखील अवलंबून राहू शकतात. जिओहॉटस्टारवर बोलताना ते म्हणाले, 'मुंबई इंडियन्स रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या आणि तिलक वर्मा यांच्यासारख्या प्रभावी खेळाडूंच्या मुख्य गटावर अवलंबून राहील. गेल्या हंगामात ट्रेंट बोल्टच्या पुनरागमनामुळे टीमची बॉलिंग बळकट झाली. मिचेल सँटनर आणि विल जॅक्स सारख्या खेळाडूंनीही टीमला बळकटी दिली आहे'
advertisement
तरुण खेळाडूंमध्ये सुधारणा
'गेल्या हंगामापेक्षा आमच्या तरुण खेळाडूंमध्ये लक्षणीय सुधारणा झाली आहे आणि आम्हाला आशा आहे की त्यांना या वर्षी त्यांचे कौशल्य दाखवण्याची संधी मिळेल. आम्ही लिलावात देशांतर्गत खेळाडूंवर लक्ष केंद्रित करू', असं जयवर्धने यांनी सांगितलं. लिलावापूर्वी, मुंबई इंडियन्सने सात खेळाडूंना रिलीज केले, ज्यात कर्ण शर्मा, बेव्हॉन जेकब्स, मुजीब उर रहमान, विघ्नेश पुथूर, केएल श्रीजीत, पीएसएन राजू, रीस टोपली आणि लिझार्ड विल्यम्स यांचा समावेश आहे, तर अर्जुन तेंडुलकरला मुंबईने लखनऊकडे ट्रेड केलं.
मुंबई प्ले-ऑफमधून बाहेर
आयपीएल 2025 मध्ये मुंबई इंडियन्सची सुरूवात खराब झाली, पण त्यानंतर टीमने जोरदार पुनरागमन करत प्ले-ऑफमध्ये प्रवेश केला. एलिमिनेटरचा सामना जिंकल्यानंतर क्वालिफायर-2 मध्ये मुंबईचा पंजाब किंग्सने पराभव केला. आयपीएल 2024 मध्ये मात्र टीमची कामगिरी निराशाजनक झाली होती. सर्वाधिक 5 वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकलेल्या मुंबईला 2020 नंतर एकदाही जेतेपद पटकावता आलेलं नाही, त्यामुळे यंदाच्या मोसमात सहावी ट्रॉफी जिंकण्याची तयारी मुंबईने सुरू केली आहे.
