नॅचरल गेमवर फोकस करणं गरजेचं - इरफान पठाण
ज्यावेळी एखादा खेळाडू पुनरागमन करतो, तेव्हा तो खूप उत्साहात असतो, पण कधीकधी स्वतःवर परफॉर्मन्सचे जास्त ओझं घेतो. हे प्रेशर अपयशाकडे नेऊ शकते. त्यामुळे पृथ्वीने शांत राहून आपल्या नॅचरल गेमवर फोकस करणे गरजेचं आहे, असं इरफाण पठाण म्हणाला. गेल्या काही काळात पृथ्वीला अनेक चढ-उतारांचा सामना करावा लागला आहे. मात्र, अलीकडेच महाराष्ट्र टीमकडून खेळताना त्याने 'सैयद मुश्ताक अली ट्रॉफी'मध्ये सर्वाधिक रन्स कुटले होते. आता पृथ्वी शॉ स्वतःला सिद्ध करण्यासाठी सज्ज असल्याचे पठाणने म्हटलं आहे.
advertisement
पृथ्वी शॉला संधी दिली पाहिजे - इरफान पठाण
दिल्ली कॅपिटल्सकडे अभिषेक पोरेल याच्या स्वरूपात एक पर्याय आहे. जो जेव्हा जेव्हा संधी मिळेल, तेव्हा खेळतो आणि संघाला चांगली सुरूवात करून देतोय. पण यावेळी पृथ्वी शॉला संधी दिली पाहिजे, असं इरफाण पठाण म्हणाला. रणजी ट्रॉफीमध्ये महाराष्ट्रासाठीच्या आपल्या पहिल्याच हंगामात, शॉने सात सामन्यांत 537 धावा केल्या आणि त्यानंतर आपली हीच बहारदार कामगिरी त्याने सय्यद मुश्ताक अली करंडकातही कायम राखली. या 25 वर्षीय खेळाडूने सात सामन्यांत 183 धावा केल्या, ज्यामध्ये त्याचा स्ट्राईक-रेट 160 च्या किंचित वर होता.
केएल राहुलचे कौतुक
दरम्यान, इरफान पठाणने आपल्या यूट्यूब चॅनेलवर केएल राहुलचे कौतुक केलं. स्ट्राइक रेटवरून होणाऱ्या टीकेला उत्तर देताना तो म्हणाला, "केएल राहुल हा असा खेळाडू आहे जो प्रत्येक सीजनमध्ये 500 रन्स बनवण्याची क्षमता ठेवतो. तो टीमसाठी सर्वात सुरक्षित पर्याय आहे. जोपर्यंत टीम मॅच जिंकतेय, तोपर्यंत त्याच्या स्ट्राइक रेटची चिंता करण्याची गरज नाही, कारण तो एक खरा मॅच-विनर आहे.", असं इरफान पठाण म्हणाला.
