काय म्हणाले वेंगसरकर?
'आयपीएलमध्ये केलेले रन आणि विकेट कुणाच्या लक्षात राहतात? पण चाहत्यांना भारत-इंग्लंड सीरिजमधील मोहम्मद सिराजची उत्कृष्ट कामगिरी, शुभमन गिल, केएल राहुल, यशस्वी जयस्वाल आणि ऋषभ पंत यांनी केलेल्या रन आणि वॉशिंग्टन सुंदरची ऑलराऊंड कामगिरी लक्षात राहिल', असं वेंगसरकर म्हणाले.
भारताकडून 116 टेस्ट मॅच खेळलेले दिलीप वेंगसरकर हे 2006-2008 दरम्यान टीम इंडियाचे निवड समिती प्रमुख होते. निवड समिती प्रमुख असताना दिलीप वेंगसरकर यांनी सौरव गांगुली आणि राहुल द्रविड या दिग्गज खेळाडूंना वनडे क्रिकेटमधून बाहेर केलं. तसंच वेंगसरकर निवड समिती प्रमुख असताना भारताने टी-20 वर्ल्ड कपही जिंकला. दिलीप वेंगसरकर यांनी टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीमध्ये बुमराहबद्दल कठोर शब्द वापरले आहेत.
advertisement
'भारत-इंग्लंड सीरिजचं महत्त्व आणि बुमराहच्या पाठीची दुखापत पाहता, बीसीसीआय, निवड समिती आणि भारतीय टीम मॅनेजमेंटने त्याला आयपीएल 2025 मध्ये विश्रांती द्यायला पाहिजे होती. बुमराह आयपीएल खेळला नसता तर भारत-इंग्लंड सीरिजसाठी पूर्णपणे फिट झाला असता. जर मी निवड समिती प्रमुख असतो तर मुंबई इंडियन्स आणि बुमराहला समजवलं असतं, की इंग्लंड सीरिजसाठी बुमराहचं आयपीएल न खेळणं किती गरजेचं आहे. मला विश्वास आहे, त्यांनी माझं हे म्हणणं ऐकलं असतं', असं वक्तव्य वेंगसरकर यांनी केलं आहे.
'अशा प्रकारची सीरिज 4 वर्षांमधून एकदा होते. टीम इंडिया जानेवारी 2027 पर्यंत (ऑस्ट्रेलियाविरुद्ध) पाच टेस्ट मॅचची सीरिज खेळणार नाही. ही कायम लक्षात राहील अशी सीरिज होती. बुमराह सगळ्या मॅच खेळला असता, तर भारत कदाचित सीरिजही जिंकू शकला असता', असंही वेंगसरकर म्हणाले.