पॉईंट्स टेबलमध्ये गुजरात अव्वल स्थानी
मंगळवारी झालेल्या मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात टायटन्स या सामन्यात गुजरात टायटन्सने बाजी मारली. मुंबईच्या प्रतिष्ठित वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात टायटन्सचा 56 वा सामना खेळवला गेला. या सामन्यात गुजरात टायटन्सने टॉस जिंकत गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हंगामातील आठव्या विजयासह, गुजरातने 16 गुण आणि 0.793 च्या नेट रन रेटसह पॉइंट टेबलमध्ये अव्वल स्थान पटकावले आहे. त्यांनी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला मागे टाकले. दुसरीकडे, मुंबईने 12 पैकी सात सामने जिंकले आणि पाच सामने गमावले आणि चौथ्या स्थानावर पोहोचली.
advertisement
मुंबईच्या पराभवाचा आरसीबीला फटका
या सामन्यानंतर पॉइंट्स टेबलमध्ये उलटफेर झालेला पाहायला मिळाला. RCB ने सर्वात आधी १६ पॉईंट्स कमवत पॉइंट्स टेबलमध्ये पहिलं स्थान पटकावलं होत. त्यांनी +0.482 नेट रन रेटसह पॉइंट्स टेबलमध्ये प्रथम क्रमांकावर स्थान मिळवलं होत. पण काल झालेल्या मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात टायटन्स या सामन्यात +0.793 च्या नेट रन रेटसह अव्वल स्थान पटकावलं आहे. मुंबई विरुद्ध गुजरात या सामन्यात अनेक रोमांचपूर्ण क्षण पाहायला मिळाले पण मुंबई च्या पराभवाचा धक्का मात्र आरसीबीला बसलेला पाहायला मिळत आहे.
पावसाने प्रभावित झालेल्या या सामन्यात गुजरातने शेवटच्या षटकात शानदार विजय मिळवला. खरंतर, 18 व्या षटकानंतर पाऊस सुरू झाला आणि सामना थांबवण्यात आला. त्यावेळी जेराल्ड कोएत्झी आणि राहुल तेवतिया प्रत्येकी 5 धावांसह क्रीजवर होते. गुजरातचा स्कोअर 132/6 होता. आता त्यांना जिंकण्यासाठी शेवटच्या दोन षटकांत 24 धावांची आवश्यकता होती. तथापि, पावसामुळे सामना उशिरा सुरू झाला आणि डीएलएस पद्धतीने त्यांना 19 षटकांत 147 धावांचे नवीन लक्ष्य देण्यात आले.