काय म्हणाली प्रिया सरोज?
काही दिवस शाईने लिहिलेले असतात, पण 8 मार्चसारखे दिवस इतिहासात कायमचा कोरला गेला आहे. हा दिवस टीम इंडियाने आयसीसी टी-20 वर्ल्ड कप जिंकला, प्रत्येक भारतीयाचे हृदय अभिमानाने भरून गेलंय. हा क्षण हा देश पिढ्यानपिढ्या लक्षात ठेवेल आणि साजरा करेल, असं प्रिया सरोज म्हणाली.
मी एका मुलाची ताकद...
टीम इंडियाच्या या ऐतिहासिक विजयादरम्यान, मी एका मुलाची ताकद देखील पाहिली जो त्याच्या वडिलांसाठी, त्याच्या संघासाठी आणि त्याच्या देशासाठी खंबीरपणे उभा राहिला. आयुष्यातील सर्वात कठीण क्षणांमध्येही मैदानावर उतरणं आणि विजेता बनणं हे खरोखरच धाडसी कृत्य आहे, असंही प्रिया सरोज म्हणली.
रिंकूने टीमची साथ सोडली नाही
दरम्यान, टीम इंडिया आणि रिंकु सिंगचं अभिनंदन, ज्यांनी जगाला खरी ताकद काय असते हे दाखवून दिलं, असं म्हणत प्रिया सरोजने भावना व्यक्त केल्या. रिंकु सिंग याला प्लेइंग इलेव्हनमध्ये अखेरच्या सामन्यात संधी मिळाली नाही. पण रिंकूने टीमची साथ सोडली नाही. घरात दु:ख असताना देखील तो मैदानात थांबला अन् टीम इंडियाला अखेरच्या सामन्यापर्यंत साथ दिली.
