TRENDING:

BCCI सोबत पंगा महागात पडणार, बांगलादेश भिकेला लागणार, खेळाडूंमध्ये भीतीचे वातावरण

Last Updated:

बांगलादेशमध्ये हिंदूंवर सूरू असलेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर यपीएलमधून मुस्तफिजूर रहमानची हकालपट्टी करण्यात आली होती.या घटनेने आक्रामक झालेल्या बांगलादेश क्रिकेट बोर्डाने भारतात टी20 वर्ल्ड कप 2026 चे सामने न खेळण्याची भूमिका घेतली होती.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
T20 World Cup : टी20 वर्ल्ड कप 2026 सूरू व्हायला आता फक्त महिन्याभराचा कालावधी उरला आहे.पण अजूनही बांगलादेश क्रिकेट बोर्ड आणि बीसीसीआय यांच्यातला वाद काय शमायला तयार नाही आहे. मुस्तफिजुरच्या हकालपट्टीनंतर बांगलादेश संघाने भारतात वर्ल्ड कप सामने खेळण्यास नकार दिला होता.यानंतर आता भारताच्या स्पॉन्सर्सनी बांगलादेश संघासोबत असलेला करार रद्द करण्याची भूमिका घेतल्याची माहिती सुत्रांकडून समोर येत आहेत. असे जर झाल्यास बांगलादेश संघ भिकेला लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
T20 World Cup
T20 World Cup
advertisement

बांगलादेशमध्ये हिंदूंवर सूरू असलेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर यपीएलमधून मुस्तफिजूर रहमानची हकालपट्टी करण्यात आली होती.या घटनेने आक्रामक झालेल्या बांगलादेश क्रिकेट बोर्डाने भारतात टी20 वर्ल्ड कप 2026 चे सामने न खेळण्याची भूमिका घेतली होती.यासंबंधी पत्र देखील त्यांनी आयसीसीला दिले होते.

पण आता बांगलादेशच्या या भूमिकेनंतर भारतीय क्रीडा उपकरणे उत्पादक कंपनी सॅन्सपॅरेल्स ग्रीनलँड्स (एसजी) ने कर्णधार लिटन दाससह अनेक बांगलादेशी क्रिकेटपटूंसोबतचे स्पॉन्सरशीप करार रद्द करण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त समोर आले आहे. याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती जाहीर झालेली नसली तरी, खेळाडू आणि त्यांच्या व्यवस्थापकांना कळवण्यात आले आहे.दरम्यान जर असे झाल्यास बांगलादेश क्रिकेटर भिकेला लागण्याची शक्यता आहे.

advertisement

"मला अशा प्रकारची कोणतीही अधिकृत माहिती ऐकायला मिळालेली नाही,जी संघातील गोंधळ दर्शवते,असे एसजीने प्रायोजित केलेल्या एका बांगलादेशी क्रिकेटपटूने क्रिकबझला सांगितले.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
संक्रांतीच्या काळात लहान मुलांना बोरन्हाण का घालतात?तुम्हाला माहितीये का परंपरा?
सर्व पहा

तसेच नाव न सांगण्याच्या अटीवर क्रिकबझशी बोलताना, बीसीबीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने मान्य केले की खेळाडू मानसिक तणावाखाली त.आहे "क्रिकेटपटूंसाठी हा खूप कठीण काळ आहे कारण त्यांना माहित नाही की येणारे दिवस त्यांच्यासाठी काय घेऊन येत आहेत. ते खूप तणावाखाली आहेत आणि ते स्वाभाविक आहे." त्यांनी पुढे स्पष्ट केले की खेळाडू बांगलादेश क्रिकेट बोर्डाकडून निर्णयाची वाट पाहत आहेत जेणेकरून ते विश्वचषकाची तयारी सुरू करू शकतील.

advertisement

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
BCCI सोबत पंगा महागात पडणार, बांगलादेश भिकेला लागणार, खेळाडूंमध्ये भीतीचे वातावरण
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल