पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने बहिष्काराच्या या निर्णयाबाबत आयसीसीला सूचित केलं नाही, तर भारत-पाकिस्तान मॅच सक्रिय राहिल त्यामुळे हा वाद येत्या काही दिवसांमध्येही सुरू राहिल. आयसीसी पीसीबीकडून अधिकृत माहितीची वाट पाहत आहे, जोपर्यंत पीसीबी भारताविरुद्धच्या सामन्यावर पाकिस्तान बहिष्कार टाकत आहे, तोपर्यंत आयसीसी पुढचं पाऊल टाकणार नाही.
टीम इंडियाला कोलंबोला जावं लागणार
टीम इंडिया 15 फेब्रुवारीच्या पाकिस्तानविरुद्धच्या टी-20 वर्ल्ड कप मॅचसाठी कोलंबोला जाणार आहे, तसंच एक दिवस आधी होणाऱ्या पत्रकार परिषदेमध्येही भाग घेईल. एवढंच नाही तर कर्णधार सूर्यकुमार यादवला टॉससाठी मैदानात यावं लागेल. या सामन्यासाठी पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली आगा टॉससाठी आला नाही, तर मॅच रेफ्री टीम इंडियाचा विजय झाला असं घोषित करतील आणि भारताला 2 पॉईंट्स दिले जातील. भारतीय टीम मॅच खेळण्यासाठी कोलंबोला गेली नाही, तर रेफ्री दोन्ही टीमना एक-एक पॉईंट देतील.
advertisement
आयसीसी पाकिस्तानवर बंदी आणणार?
जर पाकिस्तानने भारताविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार टाकला तर त्यांच्यावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून हकालपट्टी व्हायची शक्यता आहे. तसंच आयसीसीने पाकिस्तानला टी-20 वर्ल्ड कपमधून बाहेर काढलं तर त्यांच्याऐवजी युगांडाला वर्ल्ड कप खेळण्याची संधी मिळेल.
