TRENDING:

Team India : 'वडिलांना फोर्थ स्टेज कॅन्सर...', ऐन वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाची साथ सोडून गेला मॅच विनर!

Last Updated:

टी-20 वर्ल्ड कपच्या सुपर-8 मध्ये टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा पहिला सामना 76 रननी गमावला आहे, त्यातच टीम इंडियाला आता मोठा धक्का बसला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
Choose
News18 on Google
advertisement
चेन्नई : टी-20 वर्ल्ड कपच्या सुपर-8 मध्ये टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा पहिला सामना 76 रननी गमावला आहे, त्यातच टीम इंडियाला आता मोठा धक्का बसला आहे. भारतीय टीम टी-20 वर्ल्ड कपचा दुसरा सुपर-8 सामना झिम्बाब्वेविरुद्ध खेळणार आहे. या सामन्यापूर्वी, स्फोटक बॅटर रिंकू सिंग घरी परतला आहे. टीम इंडियाने मंगळवारी चेपॉक स्टेडियमवर सराव सत्र आयोजित केले होते, ज्यामध्ये रिंकू सिंग वगळता सर्व खेळाडू सहभागी झाले होते.
'वडिलांना फोर्थ स्टेज कॅन्सर...', ऐन वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाची साथ सोडून गेला मॅच विनर!
'वडिलांना फोर्थ स्टेज कॅन्सर...', ऐन वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाची साथ सोडून गेला मॅच विनर!
advertisement

रिंकू सिंगचे वडील आजारी

रिंकू सिंग त्याच्या वडिलांच्या आजारामुळे घरी परतला आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, त्याचे वडील गेल्या एक वर्षापेक्षा जास्त काळ कर्करोगावर उपचार घेत आहेत. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती बिघडली आहे. रिंकूच्या वडिलांचा कर्करोग चौथ्या टप्प्यात पोहोचला असल्याचे वृत्त आहे. यामुळे रिंकूला घरी परतावे लागले आहे. 28 वर्षीय रिंकू हा उत्तर प्रदेशातील अलिगडचा रहिवासी आहे. टीम इंडिया 26 फेब्रुवारी रोजी झिम्बाब्वेविरुद्ध खेळणार आहे. रिंकू कधी परतेल हे स्पष्ट नाही. पण, तो लवकरच संघात सामील होईल असे म्हटले जात आहे.

advertisement

रिंकूची बॅट शांत

रिंकू आतापर्यंत स्पर्धेतील सर्व सामन्यांमध्ये भारताच्या प्लेइंग इलेव्हनचा भाग आहे. पण, तो बॅटने एकही महत्त्वाची खेळी खेळू शकलेला नाही. त्याने पाकिस्तानविरुद्ध शेवटच्या ओव्हरमध्ये शाहीन आफ्रिदीवर आक्रमण केलं. स्पर्धेतील पहिल्या दोन सामन्यांमध्ये तो पूर्णपणे अपयशी ठरला. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या सुपर 8 सामन्यात रिंकूला त्याचे खातेही उघडता आले नाही.

advertisement

भारताला विजय गरजेचे

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
वाहतूक कोंडीतून होणार सुटका, पुणे पोलिसांची ट्रॅफिकक्युअर प्रणाली काय? Video
सर्व पहा

भारतीय टीमची सेमी फायनलमध्ये पोहोचण्याची शक्यता दिवसेंदिवस कठीण होत चालली आहे. टीम इंडियाचा दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 76 रनच्या मोठ्या फरकाने पराभूत झाला. याचा त्यांच्या नेट रन रेटवर लक्षणीय परिणाम झाला आहे. हे सुधारण्यासाठी, भारताला झिम्बाब्वेविरुद्ध मोठा विजय आवश्यक आहे. याव्यतिरिक्त, भारताला वेस्ट इंडिजविरुद्ध विजय आवश्यक आहे. जर भारत आणि दक्षिण आफ्रिका त्यांचे उर्वरित दोन्ही सामने जिंकले तर दोन्ही टीम सेमी फायनलमध्ये प्रवेश करतील. जर दक्षिण आफ्रिका वेस्ट इंडिजविरुद्ध हरली आणि भारत दोन्ही सामने जिंकला तर सेमी फायनलच्या टीम नेट रन रेटने ठरवल्या जातील.

advertisement

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Team India : 'वडिलांना फोर्थ स्टेज कॅन्सर...', ऐन वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाची साथ सोडून गेला मॅच विनर!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल