ब्रिस्बेनमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात भारताला मोठा धक्का बसला होता. कारण टीम इंडियाची कर्णधार हरमनप्रीत कौरला फलंदाजी करताना गुडघ्याला दुखापत झाली होती. यु दुखापतीमुळे ती दुसऱ्या डावात क्षेत्ररक्षणाला आली नाही. त्यामुळे तिच्या अनुपस्थितीत उपकर्णधार स्मृती मानधना यांना संघाचे नेतृत्व करावे लागले. तसेच बीसीसीआयने दुखापतीची पुष्टी केली आणि सांगितले की त्यांची वैद्यकीय टीम तिच्या प्रकृतीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.
advertisement
दरम्यान हरमनप्रीत कौरची दुखापत पाहता ती स्पर्धेबाहेर होण्याची शक्यता आहे.त्यामुळे टीम इंडियाला हा मोठा धक्का असणार आहे. सामन्या बद्दल बोलायच झालं तर स्मृती मानधनाने 58 धावांची सर्वाधिक अर्धशतकीय खेळी केली होती.तिच्या पाठोपाठ कॅप्टन हरमनप्रीत कौरने 53 धावांची खेळी केली होती.या व्यतिरीक्त काश्वी गौतमने 43 धावांची खेळी केली होती. या बळावर भारताने प्रथम फलंदाजी करताना 214 धावा केल्या होत्या. ऑस्ट्रेलियाकडून अॅशले गार्डनरने 3,मेगन स्कटने 2, डार्सी ब्राऊन,अलाना किंग, ताहीला मॅकग्राथ आणि सोफीने प्रत्येकी 1 विकेट काढली होती.
भारताने दिलेल्या 214 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने 38.2 ओव्हरमध्ये हे लक्ष्य गाठलं होतं. ऑस्ट्रेलियाकडून बेथ मुनीने 76 धावांची शतकीय खेळी केली होती. अॅलिसा हेलीने 50 धावांची तर अॅनाबेल सुथरलँडने 48 धावांची खेळी केली होती. या खेळीच्या बळावर ऑस्ट्रेलियाने 6 विकेट राखून विजय मिळवला होता. या विजयासह ऑस्ट्रेलियाने तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे.
