खरं युपी वॉरियर्सने दिल्ली कॅपिटल्ससमोर 123 धावांचे लक्ष्य ठेवले होते.या लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्लीची सुरुवात खराब झाली होती. दिल्लीकडून लिझेली 10 धावांवर स्वस्तात बाद झाली होती.त्यानंतर शेफाली वर्मा आणि लोरा वोव्हार्टने दिल्लीचा डाव सावरला होता. त्यानंतर लोरा वोव्हार्ट अर्धशतकाच्या जवळ असताना 47 धावांवर बाद झाली होती.यानंतर कर्णधार जेमीमा रॉड्रीग्ज मैदानात आली होती.
advertisement
जेमीमा मैदानात उतरताच एकामागून एक विकेट पडली होती. यानंतर जेमिमाने एका बाजूने डाव सावरून 34 धावांची नाबाद खेळी करून हा सामना 5 विकेट राखून जिंकला आहे.
युपी वॉरियर्स 20 ओव्हरमध्ये फक्त 122 धावा करू शकली होती. युपीकडून दिप्ती शर्माने सर्वाधिक 24 धावा केल्या होत्या.तिच्यासोबत शिखा पांडेने 23 धावांची नाबाद खेळी केली होती.या खेळीच्या बळावर त्यांनी 122 धावा केल्या होत्या. तर दिल्लीकडून मेरीजन कापने 3,चिनेली हेन्री आणि श्री चरणीने प्रत्येकी 2 विकेट घेतल्या होत्या. आणि मिनू मानीने 1 विकेट घेतली होती.
दरम्यान हा सामना मुंबई इंडियन्सच्या दृष्टीने खूप महत्वाचा होता. कारण मागच्या सामन्यात हरमनप्रीत कौरच्या संघाचा निसटता पराभव झाला होता.त्यामुळे मुंबई इंडियन्सच प्लेऑफचं भवितव्य दिल्ली कॅपिटल्स आणि युपी वॉरियरर्सच्या हातात होतं. पण या सामन्यात दिल्लीने युपीचा पराभव झाल्याने मुंबई स्पर्धेतून बाहेर झाली आहे.
दिल्लीने हा सामना जिंकून प्लेऑफमध्ये स्थान मिळवलं आहे.आता एलिमिनेटरमध्ये दिल्लीचा सामना गुजरात जाएटसशी होणार आहेत.या सामन्यातील विजेता संघ हा रॉयल चँलेजर्स बंगळुरूसोबत डब्ल्युपीएलच्या फायनलमध्ये भिडणार आहे.
