सीसीटीव्ही सिस्टमवर देखरेख वाढली
टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, गेल्या काही काळापासून सार्वजनिक आणि सरकारी ठिकाणांवर वापरल्या जाणाऱ्या सीसीटीव्हीविषयी चिंता वाढलीये. विशेषतः जे डिव्हाइस परदेशातून आयात केले जाताय. यामध्ये सुरक्षा त्रुटी असू शकतात आणि ज्याचा चुकीचा वापर केला जाऊ शकतो असं मानलं जातंय.
सुरक्षा एजेन्सीने नुकतेच एका हेरगिरी नेटवर्कचा खुलासा केला. ज्याचे धागेदोरे हे शेजारील देशांशी संबंधित असल्याचं बोललं जातंय. यामुळे हा धोका आणखी स्पष्ट झाला की, सीसीटीव्ही सुरक्षित नसेल तर मग त्याचा दुरुपयोग केला जाऊ शकतो.
advertisement
ChatGPT ला 'हे' 5 प्रश्न विचारणं पडू शकतं महागात! आधी पाहा आणि व्हा सावध
नव्या नियमात काय?
सरकारनेआता सीटीव्ही डिव्हाइससाठी काही अनिवार्य टेक्निकल स्टँडर्ड ठरवलेय. या नियमांअंतर्गत कंपन्यांना सांगावं लागेल की, त्यांच्या डिव्हाइसमध्ये वापरले जाणारे मुख्य हार्डवेयर कंपोनेंट कुठून आणले जातात. तसंच डिव्हाइसची तपासणीही केली जाऊल. जेणेकरुन त्यात काही कमतरता आहे की नाही आणि दुरुन बसून एखादा व्यक्ती हे सीसीटीव्ही कंट्रोल करेल हा हे पाहता येईल. आता शेकडो सीसीटीव्ही या स्टँडर्डअंतर्गत प्रमाणित केले गेलेय.
सरकारी विभागांना स्पष्ट निर्देश
सरकारी ऑफिस आणइ संस्थानांना स्पष्ट निर्देश दिलेय की, त्यांनी फक्त अशाच सीसीटीव्हीचा वापर करावाज्यामध्ये नवे नियम फॉलो केले असतील. जुन्या सिस्टमची सुरक्षा तपासून त्या अपडेट करण्याचा सल्ला दिलाय.
फक्त सीसीटीव्ही नाही तर टेलिकॉम नेटवर्कलाही सुरक्षित बनवण्यासाठी नवे कायदे लागू केले गेलेय. आता डेलिकमॉ डिव्हाइस फक्त विश्वासार्ह आणि स्वीकृत कंपन्यांकडून खरेदी केले जाऊ शकतील. यामुळे नेटवर्कमध्ये कोणत्याही प्रकारची घुसखोरी रोखण्यासम मदत मिळेल.
ऑनलाइन पेमेंट करणाऱ्यांनो आधी 'हे' वाचा! 1 एप्रिलपासून बदलतोय RBI चा नियम, तुमच्यावर होणार परिणाम
एवढंच नाही तर सर्वसामान्य लोकांनीही आपले सीसीटीव्ही हे वेळोवेळी अपडेट करत राहावे. अन्यथा ते हॅक केले जाऊ शकते. ज्यामुळे तुमची सुरक्षा करणारा सीसीटीव्हीच तुम्हाला धोकात आणू शकतो.
डेटा सुरक्षा महत्त्वाची
सध्याच्या काळात डेटा सर्वात मोठी संपत्ती बनलाय. हे लक्षात घेता, सरकारने डेटा प्रोटेक्शनसंबंधित कायदा आणखी मजबूत केलाय. जेणेकरुन लोकांची पर्सनल माहिती सुरक्षित राहील आणि त्याचा चुकीचा वापर होणार नाही. जगभारतील अनेक उदाहणांमध्ये दिसलंय की, सीसीटीव्ही सिस्टमच्या माध्यमातून लोकांच्या हालचालींवर नजर ठेवण्यात आली आणि त्याचा दुरुपयोग करण्यात आला. यामुळेच आता भारतीह आपल्या डिजिटल इंफ्रास्ट्रक्चरला सुरक्षित बनवण्याच्या दिशेने वेगाने पाऊल उचलतेय.
