
छत्रपती संभाजीनगर : पूर्वीचे औरंगाबाद आणि सध्याचे छत्रपती संभाजीनगर हे 52 दरवाजांचे शहर म्हणून जगभरात प्रसिद्ध आहे. शहराच्या संरक्षणासाठी 52 दरवाजे होते, असे सांगितले जाते. पण खरंच शहराला 52 दरवाजे होते का? तसेच 52 दरवाजे होते तर त्यापैकी आता किती दरवाजे अस्तित्वात आहेत? असे प्रश्न अनेकांना पडतात. याबद्दलच इतिहास अभ्यासक संकेत कुलकर्णी यांनी माहिती दिली आहे.