
कल्याण : चिंबोरी थंडीत खाणे महत्त्वाचे मानले जाते कारण शरीराला उष्णता आणि कॅल्शियम जास्त प्रमाणात चिंबोरीमधून मिळत असतो. त्यामुळे बहुतांश लोक उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात चिंबोरी खाणे टाळतात परंतु हिवाळ्यात आवर्जून याचे सेवन केले जाते. आज आपण आगरी पद्धतीतले झणझणीत मसालेदार चिंबोरी रस्सा कसा बनवायचा बघणार आहोत. जे भाकरी किंवा भातासोबत अप्रतिम लागते.