नवी दिल्ली: भारत विरुद्ध पाकिस्तान संघर्ष दिवसेंदिवस चिघळत आहे. पाकिस्तान मागे हटण्याचं नाव घेत नाही. फ्रंटलाईनवर सैन्य वाढवत आहे. या दरम्यान भारतीय सैन्य दलाने पाकिस्तानच्या मनसुब्यांना पुन्हा एकदा सुरुंग लावला आहे. पाकिस्तानने 26 ठिकाणी घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. चार एअरबेसवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता मात्र तो हाणून पाडला आहे. 9 मे रोजी पाकिस्ताननं केलेल्या हल्ल्याला भारतीय सैन्य दलाने चोख प्रत्युत्तर दिलं आहे. प्रत्येक भारतीयाने हा व्हिडीओ बघायला हवा. हा व्हिडीओ अंगावर शहारा आणणारा आहे.