
महेश मांजरेकर आणि खासदार संजय राऊत यांची ठाकरे बंधूंची मुलाखत घेतली. तेव्हा राज ठाकरे मुलाखतीमध्ये बोलताना म्हणाले, आज संकट महाराष्ट्रावर आहे, मुंबईवर आहे. हे संकट मराठी माणसाला समजलं आहे.काय प्रकारचं राजकारण महाराष्ट्रात सुरु आहे हे ही माहिती आहे.एकच गोष्ट आम्ही एकत्र यायचं कारण नाही, आमच्याच अस्तित्वाची नाही तर मराठी माणसाच्या अस्तित्वाचा विषय आहे. बाहेरुन येणाऱ्यांची दादागिरी वाढत आहे.
Last Updated: Jan 08, 2026, 15:55 ISTछत्रपती संभाजीनगर : हिवाळा ऋतू सुरू झालेला आहे. सध्याला सर्वत्रच कडाक्याची थंडी पडायला सुरुवात झालेली आहे. या हिवाळ्यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे नट्स किंवा ड्रायफ्रूट खात असतो. कारण की ते आपल्या शरीरासाठी अत्यंत फायदेशीर असतात. यापैकीच एक महत्त्वाचा नट्स म्हणजे बदाम. बदाम खाल्ल्याने अनेक फायदे आपल्या शरीराला मिळत असतात. तर बदाम खाण्याचे काय फायदे होतात? याविषयीच आहार तज्ज्ञ मंजू मठाळकर यांनी माहिती दिली आहे.
Last Updated: Jan 09, 2026, 13:05 ISTअंबरनाथ नगर पालिका निवडणूक निकालानंतर सत्ता स्थापनेसाठी भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस नगरसेवकांनी युती केल्यामुळे वरिष्ठ स्तरावरील नाराजी व्यक्त केली गेली. काँग्रेस पक्षाच्या तिकीटावर निवडून आलेले नगरसेवक थेटपणे भारतीय जनता पक्षात गेल्याने काँग्रेसला जबर झटका बसला. याच पार्श्वभूमीवर प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशाने पक्ष कायदेशीर कारवाई करण्याच्या तयारीत आहेत. राज्य आणि देशपातळीवर विचारधारेच्या मुद्द्यावरून लढणाऱ्या काँग्रेस-भाजपची युती झाल्याने आश्चर्य व्यक्त केले गेले. दोन्ही पक्षांवर टीका सुरू झाल्यानंतर काँग्रेसने आक्रमक पावले उचलून नगरसेवकांवर कारवाई करण्याचे पाऊल उचलले.
Last Updated: Jan 08, 2026, 21:47 ISTपिंपरी चिंचवड मध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजप आमदार महेश लांडगे यांच्यात शाब्दिक वाद रंगला आहे. तेव्हा प्रचारात पवारांनी पूलाचा भष्टाचार काढत वादाला आमंत्रण दिलं आहे. विरोधकांनी पवारांनी आत्मपरिक्षण करांवं असं म्हटलं आहे.
Last Updated: Jan 08, 2026, 21:39 ISTमुंबई म्हणजे ठाकरे हे गेली तीन दशकं महाराष्ट्रात समिकरण राहीलं आहे. त्यामुळे ठाकरे ब्रँडचा एक सामाजिक, राजकीय दबदबा राहिला आहे. बदलत्या राजकारणाचत ठाकरेंसमोर एक मोठं आवाहन ठाकलं आहे. ते आवाहन आहे भाजप. पण भाजपनं ठरवलंय या ठाकरे ब्रँडचा बँड वाजवायचा.
Last Updated: Jan 08, 2026, 21:25 ISTमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे बंधूंना टोला लावला आहे. ते म्हणाले, "महाराष्ट्रापासून मुंबई कोण तोडू शकतं ? हे त्यांनाही माहिती आहे. पण विकासावर बोलता येत नाही. तुमचा स्क्रिप्ट रायटर बदला, वर्षानुवर्ष तेच सुरु. दोघंही भाऊ तेच तेच बोलतात.
Last Updated: Jan 08, 2026, 18:39 IST