
मुंबई : राज्याचे माजी मुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या विमान अपघाताने अनेकांना धक्का बसला. काहींना अजूनही दादा आपल्यात नाहीत हा विचारही पटत नाही. तर दादांचा विमान अपघात हा घातपात असल्याचे अनेकांना वाटते. त्यात आमदार रोहित पवार यांचे नाव आघाडीवर आहे. त्यांनी आतापर्यंत चार पत्रकार परिषद घेऊन याविषयीचे काही पुरावे सादर केले. त्यांनी अपघाताप्रकरणी सादरीकरण करत काही प्रश्नही उपस्थित केले. तर याप्रकरणी तपास यंत्रणांच्या संथ तपासावर ताशेरेही ओढले. आमदार रोहित पवार हे मध्यंतरी दिल्लीत तळ ठोकून होते. त्यांनी विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांच्यापासून तर अनेक विरोधी गोटातील नेत्यांच्या भेटी घेतल्या. अखेर रोहित पवारांच्या लढ्याला यश मिळाले तब्बल दीड महिन्यानंतर कर्नाटकात गुन्हा दाखल झाला आहे.