निसर्ग जेव्हा कोपतो, तेव्हा तो गरिबाचा संसार उघड्यावर पाडतो, याची प्रचिती सांगलीच्या भिवघाटमध्ये आली आहे. काल झालेल्या दीड तासाच्या गारपिटीने केवळ द्राक्ष बागाच नव्हे, तर शेडवरचा १७ लाख रुपयांचा बेदाणा पूर्णपणे उद्ध्वस्त केला आहे.