भारतीय सैन्याच्या ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तान थयथयाट सुरू झाला आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी दिवसातून आता तिसऱ्यांदा ऑपरेशन सिंदूर कसं फेलं गेलं, याची माहिती आपल्या जनतेला दिली. भारताने जो हल्ला केला, त्याची किंमत त्यांना मोजावी लागेल. भारत हे विसरला आहे की आमच्या इथं बहाद्दुर लोकांची माणसं आहे. आम्ही रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत लढण्यासाठी तयार आहोत, अशी बडबड शरीफ यांनी आपल्या भाषणात केली.
advertisement
तसंच, मगळवारी रात्री संपूर्ण जगाने पाहिलं की भारताला गुडघ्यावर आणण्याला आम्हाला काही तास लागले. भारताला त्यांच्या ५ फायटर जेट विमानांवर अभिमान होता. आता ते पाकच्या जमिनीत जमीनदोस्त झाले आहे. हे आमचं उत्तर होतं. भारताच्या हल्ल्यात 26 पाकिस्तानी शहरी नागरिक मारले गेले तर 40 जण जखमी झाले आहे, असा दावा शरीफ यांनी केला.
पाक सैन्याने सांगितला वेगळाच आकडा
दरम्यान, दिवसभरापासून पाकिस्तान मृतांची संख्या लपवण्याचा ड्रामा करत आहे. याआधीच पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ म्हणाले होते की, या हल्ल्यांमध्ये २६ जणांचा मृत्यू झाला आहे आणि ४६ जण जखमी झाले आहेत. पण अवघ्या ५ मिनिटांनी, जेव्हा पाकिस्तानी सैन्याने ब्रीफिंग दिली तेव्हा मृतांची संख्या ३१ असल्याचं सांगितलं.
आकडेवारीतील या तफावतीमुळे पाकिस्तान मृतांची खरी संख्या लपवण्याचा प्रयत्न करत आहे. आंतरराष्ट्रीय माध्यमांच्या वृत्तानुसार, हल्ल्यात मारले गेलेले बहुतेक लोक दहशतवादी छावण्यांमध्ये लपलेले दहशतवादी होते. पाकिस्तानी माध्यमांमध्ये मृतांच्या संख्येबद्दल कोणतीही स्पष्ट माहिती दिली जात नाही. काही अहवालांमध्ये आठ ते २६ मृत्यूंचा उल्लेख आहे, तर काहींमध्ये ही संख्या ३१ इतकी आहे. आयएसपीआरच्या डीजीने पुष्टी केली आहे की पंजाब आणि एजेकेच्या ६ ठिकाणी भारतीय हल्ल्यात आतापर्यंत ३१ पाकिस्तानी शहीद झाले आहेत आणि ५७ हून अधिक जखमी झाले आहेत.
हल्ल्यांनंतर पाकमध्ये भयभीत वातावरण
पाकिस्तानी माध्यमांच्या वृत्तानुसार, भारतीय हल्ल्यांनंतर या भागात अराजकता पसरली होती. बहावलपूर, मुझफ्फराबाद, रावलकोट, कोटली आणि चकवाल सारख्या भागात लोक इतके घाबरले की त्यांनी आपली घरे सोडून सुरक्षित ठिकाणी पळ काढला. रुग्णालयांमध्ये आपत्कालीन सेवा सुरू करण्यात आल्या आणि शाळा बंद ठेवण्यात आल्या. अहवालांनुसार, रुग्णालयं लोकांनी भरलेली आहेत. रस्त्यांवर अजूनही रुग्णवाहिका फिरताना दिसतात. दरम्यान, पाकिस्तानचे अध्यक्ष आसिफ अली झरदारी यांनी भारतावरच आरोप केलाय. 'भारताने संपूर्ण दक्षिण आशियाई प्रदेशाची शांतता आणि स्थैर्य धोक्यात आणली आहे आणि त्याच्या शत्रुत्वपूर्ण कृतींचे या प्रदेशासाठी धोकादायक परिणाम होतील. इटलीचे गृहमंत्री मॅटेओ पिआन्टेडोसी यांच्याशी झालेल्या भेटीदरम्यान त्यांनी हे वक्तव्य केलं.
