फोन फॅक्ट्री रीसेट कधी करावा? यामुळे काय फायदा होतो? तुम्हाला माहितीच नसतील या गोष्टी

Last Updated:
तुमचा फोन स्लो झाला असेल आणि कोणतीच पद्धत काम करत नसेल तर फॅक्ट्री रिसेटने फोनची स्पीड झपाट्याने वाढू शकते. मात्र तुम्हाला माहितीये का की, फॅक्ट्री रिसेट कसं काम करतं?
1/5
अँड्रॉइड असो किंवा आयफोन असो, कोणताही फोन जास्त काळ वापरल्याने स्लो होतो. यामध्ये एवढ्या जास्त फाइल्स स्टोअर असतात की, फोन प्रोसेस करण्यास खुप वेळ लागतो. यामुळेच जुन्या फोनमध्ये लेट रिस्पॉन्स सारख्या अडचणी येतात.
अँड्रॉइड असो किंवा आयफोन असो, कोणताही फोन जास्त काळ वापरल्याने स्लो होतो. यामध्ये एवढ्या जास्त फाइल्स स्टोअर असतात की, फोन प्रोसेस करण्यास खुप वेळ लागतो. यामुळेच जुन्या फोनमध्ये लेट रिस्पॉन्स सारख्या अडचणी येतात.
advertisement
2/5
अनेकदा सॉफ्टवेअर अपडेट केल्याने हे ठीक होते. मात्र अनेकदा फॅक्ट्री रिसे करावं लागतं. फॅक्ट्री रिसेट करताना फोनची स्पीड नव्या सारखीच होते. आज आपण जाणून घेऊया फॅक्ट्री रिसेट केल्याने काय होतं आणि तुमचा फोन कधी फॅक्ट्री रीसेट करायला हवा.
अनेकदा सॉफ्टवेअर अपडेट केल्याने हे ठीक होते. मात्र अनेकदा फॅक्ट्री रिसे करावं लागतं. फॅक्ट्री रिसेट करताना फोनची स्पीड नव्या सारखीच होते. आज आपण जाणून घेऊया फॅक्ट्री रिसेट केल्याने काय होतं आणि तुमचा फोन कधी फॅक्ट्री रीसेट करायला हवा.
advertisement
3/5
फॅक्ट्री रिसेटने काय होतं? : फॅक्टरी रीसेट केल्याने तुमच्या फोनमधील लपलेले जंक साफ होतात आणि प्रोसेसरवरील भार कमी होऊ शकतो. यामुळे फोन फ्रीज होणे, रँडम रीस्टार्ट होणे, बॅटरी जलद डिस्चार्ज होणे आणि अॅप क्रॅश होणे यासारख्या समस्या देखील दूर होऊ शकतात. तुमचा फोन रीसेट केल्याने तो खरेदी करताना होता तसाच परत येतो. यामुळे अॅप्स, सेटिंग्ज आणि कॅशे केलेला डेटा देखील काढून टाकला जातो.
फॅक्ट्री रिसेटने काय होतं? : फॅक्टरी रीसेट केल्याने तुमच्या फोनमधील लपलेले जंक साफ होतात आणि प्रोसेसरवरील भार कमी होऊ शकतो. यामुळे फोन फ्रीज होणे, रँडम रीस्टार्ट होणे, बॅटरी जलद डिस्चार्ज होणे आणि अॅप क्रॅश होणे यासारख्या समस्या देखील दूर होऊ शकतात. तुमचा फोन रीसेट केल्याने तो खरेदी करताना होता तसाच परत येतो. यामुळे अॅप्स, सेटिंग्ज आणि कॅशे केलेला डेटा देखील काढून टाकला जातो.
advertisement
4/5
तुमचा फोन कधी फॅक्टरी रिसेट करावा? : तुमचा फोन वारंवार बंद होत असेल, खूप हळू चालत असेल आणि जास्त गरम होत असेल, बॅटरी जलद डिस्चार्ज होत असेल आणि अॅप क्रॅश होत असेल तर तुम्ही फॅक्टरी रिसेट करू शकता. कधीकधी या समस्या सॉफ्टवेअर अपडेट किंवा स्टोरेज साफ करून सोडवल्या जाऊ शकतात, परंतु जर हे मूलभूत उपाय काम करत नसतील, तर तुम्ही तुमचा फोन फॅक्टरी रिसेट करू शकता. लक्षात ठेवा की फॅक्टरी रिसेट केल्याने तुमचा सर्व डेटा मिटेल. म्हणून, रिसेट करण्यापूर्वी तुमच्या डेटाचा बॅकअप घ्या.
तुमचा फोन कधी फॅक्टरी रिसेट करावा? : तुमचा फोन वारंवार बंद होत असेल, खूप हळू चालत असेल आणि जास्त गरम होत असेल, बॅटरी जलद डिस्चार्ज होत असेल आणि अॅप क्रॅश होत असेल तर तुम्ही फॅक्टरी रिसेट करू शकता. कधीकधी या समस्या सॉफ्टवेअर अपडेट किंवा स्टोरेज साफ करून सोडवल्या जाऊ शकतात, परंतु जर हे मूलभूत उपाय काम करत नसतील, तर तुम्ही तुमचा फोन फॅक्टरी रिसेट करू शकता. लक्षात ठेवा की फॅक्टरी रिसेट केल्याने तुमचा सर्व डेटा मिटेल. म्हणून, रिसेट करण्यापूर्वी तुमच्या डेटाचा बॅकअप घ्या.
advertisement
5/5
रिसेट केल्यानंतर तुम्ही काय करावे? : तुमचा फोन फॅक्टरी रिसेट केल्यानंतर, तुम्ही फक्त दररोज आवश्यक असलेले अॅप्स इन्स्टॉल करावेत. यामुळे तुमचा फोन स्वच्छ राहील आणि स्टोरेज क्लीन होईल, ज्यामुळे स्लोडाऊन पुन्हा येण्यापासून रोखता येईल.
रिसेट केल्यानंतर तुम्ही काय करावे? : तुमचा फोन फॅक्टरी रिसेट केल्यानंतर, तुम्ही फक्त दररोज आवश्यक असलेले अॅप्स इन्स्टॉल करावेत. यामुळे तुमचा फोन स्वच्छ राहील आणि स्टोरेज क्लीन होईल, ज्यामुळे स्लोडाऊन पुन्हा येण्यापासून रोखता येईल.
advertisement
BJP Congress Alliance : पुन्हा भूकंपाचे संकेत! भाजप-काँग्रेस युतीच्या चर्चेने राजकीय वर्तुळात खळबळ, कुठं जुळणार समीकरण?
पुन्हा भूकंपाचे संकेत! भाजप-काँग्रेस युतीच्या चर्चेने राजकीय वर्तुळात खळबळ, कुठं
  • काही दिवसांपूर्वी अंबरनाथमध्ये भाजप-काँग्रेसच्या युतीमुळे मोठी खळबळ उडाली होती.

  • आता पुन्हा एकदा भाजप काँग्रेसची युती होणार असल्याची चर्चा सुरू आहे.

  • काँग्रेस किंग मेकरच्या भूमिकेत असल्याने आज मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे.

View All
advertisement