TRENDING:

खरंच विद्युत दाहिनीत मृत माणूस जिवंत होतो? 'त्या' हालचालींमागचं 'हे' आहे थरारक सत्य, पहा VIDEO

Last Updated:

विद्युत स्मशानभूमीत मृतदेहाला 800-1000 अंश सेल्सिअस तापमानात जाळले जाते. या प्रक्रियेदरम्यान, शरीरातील स्नायू आणि ऊतींचे आकुंचन होते, ज्यामुळे मृतदेह...

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मनुष्याच्या जीवनात आपल्या प्रियजनांना गमावण्याचं दुःख असह्य असतं. मृत्यू हे जीवनातील एक कटू सत्य आहे. मृत्यूनंतर, अंत्यसंस्काराची प्रक्रिया सुरू होते, ज्याला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. पूर्वी मृतदेह लाकडाच्या चितेवर जाळला जात असे, परंतु आता पर्यावरणाच्या संरक्षणासाठी आणि लाकडाच्या टंचाईमुळे विद्युत दाहिन्यांचा (electric crematorium) वापर वाढला आहे. मात्र, या आधुनिक तंत्रज्ञानाशी संबंधित काही गोष्टी लोकांना घाबरवतात.
Electric cremation facts
Electric cremation facts
advertisement

मृतदेह जळत असताना घडतात भयंकर गोष्टी

असं म्हटलं जातं की, विद्युत दाहिनीत मृतदेह जाळताना तो हलतो आणि त्यातून आवाज येतात, ज्यामुळे मृतदेहाला 'जीवन' मिळालं आहे असं वाटतं. खरं तर, विद्युत दाहिनीमध्ये मृतदेह उच्च तापमानावर (800-1000 अंश सेल्सिअस) जाळला जातो. ही प्रक्रिया लाकडाच्या चितेपेक्षा वेगवान आणि पर्यावरणासाठी कमी हानिकारक मानली जाते. पण या दरम्यान काही गोष्टी घडतात, ज्या भयंकर असतात.

advertisement

तज्ञांच्या मते, जेव्हा मृतदेह भट्टीत ठेवला जातो, तेव्हा उष्णतेमुळे शरीरातील स्नायू आणि ऊती पावतात. यामुळे शरीरात थोडी हालचाल किंवा पटके येऊ शकतात, ज्यामुळे मृतदेह 'उठत' असल्यासारखं दिसतो. याव्यतिरिक्त, शरीरातील द्रव आणि वायू उष्णतेमुळे वाफ होऊन बाहेर पडतात, ज्यामुळे स्फोट झाल्यासारखे किंवा रडल्यासारखे आवाज येतात. हे आवाज ऐकून लोक घाबरतात आणि मृतदेहाला 'जीवन' मिळाल्याचं समजलं जातं. पण ही एक अफवा आहे.

advertisement

अशी असते प्रक्रिया...

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये विद्युत दाहिनीच्या संपूर्ण प्रक्रियेची माहिती देण्यात आली होती. लाकडी चितेवर मृतदेह पूर्णपणे राख होतो, परंतु विद्युत भट्टीत असं होत नाही. उष्णतेमुळे मांस जळून जातं आणि फक्त हाडं शिल्लक राहतात, जी नंतर एका मशीनमध्ये (क्रेमेशन) बारीक करून पावडर केली जातात. ही पावडर अस्थिकलशात भरली जाते, ज्याला लोक राख मानतात.

advertisement

वैज्ञानिक सत्य काय?

वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिल्यास, विद्युत दाहिनीतील हालचाली आणि आवाज पूर्णपणे नैसर्गिक आहेत. मृत्यूनंतर शरीरात कोणतीही चेतना नसते आणि या हालचाली उष्णतेमुळे स्नायूंच्या आकुंचनामुळे होतात. न्यूरोलॉजिस्ट डॉ. सुधीर शाह यांच्या मते, "मृत्यूनंतर शरीरात प्राण नसतात, पण उष्णतेमुळे रासायनिक आणि भौतिक बदल होतात, ज्यामुळे असे गैरसमज निर्माण होतात." तरीही, ही प्रक्रिया लोकांमध्ये, विशेषतः ग्रामीण भागात, भीती आणि अंधश्रद्धा निर्माण करते, जिथे याला 'चमत्कार' किंवा 'अलौकिक' घटना मानले जाते.

हे ही वाचा : सातवी नापास 'मँगो मॅन'! एकाच झाडावर पिकवल्या 350 आंब्याच्या जाती; 84 वर्षीय आजोबांनी केला चमत्कार, वाचा सविस्तर...

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
इंजिनिअर तरुणाने नोकरी सोडली, पाहिलेलं स्वप्न केलं पूर्ण, आज आहे 45 कॅफेचा मालक
सर्व पहा

हे ही वाचा : कोल्ड्रिंक्स बाटलीच्या झाकणात 'गोल रबर' कशासाठी असतो? 90% लोकांना माहिती नसेल याचं उत्तर!

मराठी बातम्या/Viral/
खरंच विद्युत दाहिनीत मृत माणूस जिवंत होतो? 'त्या' हालचालींमागचं 'हे' आहे थरारक सत्य, पहा VIDEO
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल