TRENDING:

ढगफुटी म्हणजे नक्की काय? हे कशामुळे होतं माहितीय का?

Last Updated:

पावसाळ्यात डोंगराळ भागात ढग फुटणे ही एक सामान्य घटना मानली जाते. पण ढगफुटीमुळे कधी कधी मोठे नुकसान होते.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : मान्सूनचे आगमन होताच मुसळधार पाऊस, विजांचा कडकडाट आणि पुर, वादळ सारख्या बातम्या समोर येऊ लागतात. त्यात आणखी एका गोष्टीबद्दल बोललं जातं, ते म्हणजे ढगफुटीबद्दल. पण हे ढग फुटी म्हणजे नक्की काय? पावसात ढग का फुटतात? असा प्रश्न अनेकांना पडला असेल, पण क्वचितच कोणाला त्याचं उत्तर माहित असेल. चला याबद्दल सविस्तर जाणून घेऊ.
प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो
advertisement

पावसाळ्यात डोंगराळ भागात ढग फुटणे ही एक सामान्य घटना मानली जाते. पण ढगफुटीमुळे कधी कधी मोठे नुकसान होते.

हिमाचल आणि उत्तराखंडमध्ये दरवर्षी पावसाळ्यात ढग फुटण्याच्या घटना घडतात. या घटनांमध्ये अनेक वेळा जीवित आणि वित्तहानी होते. ढग फुटण्याच्या बहुतांश घटना केवळ पावसाळ्यात घडतात.

सामान्य लोकांना असे वाटते की ढग फुग्याप्रमाणेच फुटतो. जिथे ढग फुटतात, त्याच वेळी खूप मुसळधार पाऊस पडतो, तो इतका जोरदार असतो की त्यामुळे पुरपरिस्थीती निर्माण होते. ढग फुटी ही पर्वतमध्ये मोठ्याप्रमाणात होते.

advertisement

पावसाळ्यात वीज पडण्याचा धोका कोणाला सर्वाधीक असतो? यापासून कसं वाचावं?

IMD नुसार, एका ठिकाणी एका तासात 100 मिमी पाऊस पडत असेल, तर त्याला ढग फुटणे म्हणतात. हे असेच आहे की, पाण्याचा फुगा कुठेतरी फुटला की अचानक सर्व पाणी एकाच ठिकाणी पडते. या घटनेला क्लाउडबर्स्ट किंवा फ्लॅश फ्लड असेही म्हणतात.

advertisement

मिळालेल्या माहितीनुसार, जेव्हा भरपूर आर्द्रता असलेले ढग एका ठिकाणी जमतात तेव्हा तिथे उपस्थित असलेले पाण्याचे थेंब एकमेकांना भेटतात. त्याच्या वजनामुळे ढगाची घनता वाढते आणि अचानक मुसळधार पाऊस सुरू होतो.

आम्ही तुम्हाला सांगतो की ढग फुटण्याच्या घटना बहुतेक पर्वतांवर घडतात, कारण पाण्याने भरलेले ढग वाऱ्याने उडतात. अशा परिस्थितीत अनेक वेळा ते पर्वतांमध्ये अडकतात आणि पर्वतांच्या उंचीमुळे पुढे जाता येत नाहीत. हे ढग डोंगरात अडकताच त्यांचे पाण्यात रुपांतर होऊन एका ठिकाणी पाऊस पडू लागतो. ढगांची घनता पूर्वीपेक्षा खूप जास्त आहे, त्यामुळे मुसळधार पाऊस सुरू होतो.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
चांगापूरचं प्रसिद्ध हनुमान मंदिर, ‘त्या’ विहिरीला 108 प्रदक्षिणा, पूर्ण होतात मनोकामना, Video
सर्व पहा

एवढेच नाही तर ढगफुटीमुळे परिस्थिती गंभीर बनते. नद्या-नाल्यांच्या पाण्याच्या पातळीत अचानक वाढ झाल्याने पूरस्थिती निर्माण होते. डोंगरात उताराचे रस्ते आहेत, अशा स्थितीत पाणी थांबू शकत नाही पण वेगाने खाली वाहते. अशा स्थितीत हे पाणी आपल्यासोबत माती, चिखल, दगड तसेच प्राणी, माणसे किंवा उपस्थीत कोणत्याही वस्तू घेऊन जाते.

मराठी बातम्या/Viral/
ढगफुटी म्हणजे नक्की काय? हे कशामुळे होतं माहितीय का?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल