गोंडाच्या खोड़ारे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दौलतपूर ग्रांट गावात हा प्रकार घडला. हरिश्चंद्र नावाचा 40 वर्षीय व्यक्ती आपल्या 35 वर्षीय बायको करिश्मा आणि दोन मुलांसोबत राहत होता. हरिश्चंद्र सूरतमध्ये काम करत असे, पण आजारपणामुळे तो गावी परत आला होता. तेव्हा त्याला समजलं की करिश्माचे सूरतमध्ये असतानाच महाराजगंज जिल्ह्यातील शिवराज नावाच्या व्यक्तीशी प्रेमसंबंध सुरू झाले होते.
advertisement
एका दिवशी गावकऱ्यांनी हरिश्चंद्रला सांगितलं की करिश्मा आणि शिवराज एकत्र आहेत. तो घरी आला आणि त्यांना रंगेहाथ पकडलं. मात्र रागाच्या भरात काही चुकीचं पाऊल उचलण्याऐवजी हरिश्चंद्रने धक्कादायक निर्णय घेतला त्याने ठरवलं की करिश्माने जर प्रेमी निवडला आहे, तर त्याच्याशीच तिचं लग्न करून दिलं पाहिजे.
गावातील बुढ्ढू बाबा मंदिरात सर्वांच्या उपस्थितीत हरिश्चंद्रने आपल्या हाताने बायकोचं कुंकू पुसलं. त्यानंतर पंडिताला बोलावून शिवराज आणि करिश्माचं लग्न लावून दिलं. हे पाहून गावकरी अवाक झाले. त्यावेळी करिश्माला वाईट वाटलं ज्यामुळे रडत होती, पण तिन् आपल्या प्रियकराशी लग्न केलंच. नवऱ्यानं तिला न स्वीकारण्यासाठी आपलं मन बनवलं होतं. अखेर लग्नानंतर करिश्मा तिच्या मुलीसोबत प्रेमीसोबत निघून गेली, तर मुलगा हरिश्चंद्रसोबत राहिला.
या प्रकरणावर खोड़ारे पोलीस ठाण्याचे प्रभारी प्रबोध कुमार यांनी सांगितलं की, "या लग्नाविषयी थेट कुणीही तक्रार दिली नाही. जर कोणीतरी तक्रार देईल, तर चौकशी करून कायदेशीर कारवाई केली जाईल." या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. यात नवरा स्वत: आपल्या हाताने बायकोचं डोक्यातील सिंदूर साफ करत असताना दिसत आहे. नात्यांचं हे विचित्र रूप पाहून अनेक जण हैराण झाले आहेत.
