advertisement

Crime : रात्रभर गर्लफ्रेंडचा फोन बिझी, 5.50 लाखांची उधारी अन् संशय, प्रेमाच्या कहाणीचा रक्तरंजित शेवट

Last Updated:

गर्लफ्रेंडचा फोन रात्रीच्या वेळी बिझी यायचा, त्यामुळे बॉयफ्रेंडचा संशय आला, त्यातच गर्लफ्रेंडने बॉयफ्रेंडला कार खरेदी करण्यासाठी दिलेले 5.50 लाख रुपये परत मागितले.

रात्रभर गर्लफ्रेंडचा फोन बिझी, 5.50 लाखांची उधारी अन् संशय, प्रेमाच्या कहाणीचा रक्तरंजित शेवट
रात्रभर गर्लफ्रेंडचा फोन बिझी, 5.50 लाखांची उधारी अन् संशय, प्रेमाच्या कहाणीचा रक्तरंजित शेवट
Crime : गर्लफ्रेंडचा फोन रात्रीच्या वेळी बिझी यायचा, त्यामुळे बॉयफ्रेंडचा संशय आला, त्यातच गर्लफ्रेंडने बॉयफ्रेंडला कार खरेदी करण्यासाठी दिलेले 5.50 लाख रुपये परत मागितले. या दोन्ही गोष्टींमुळे बॉयफ्रेंडच्या आतला राक्षस जागा झाला आणि त्याने गर्लफ्रेंडचा मर्डर केला. मृत महिला नीलेश आणि सत्येंद्र एकमेकांवर प्रेम करत होते, अनेक महिने चाललेल्या या प्रेमकहाणीचा संशयामुळे खळबळजनक शेवट झाला. नीलेशचा नंबर अनेकदा व्यस्त असायचा, त्यानंतर सत्येंद्रला तिचे दुसऱ्या कोणाशी तरी संबंध असल्याचा संशय आला. तेव्हापासून दोघांमध्ये दुरावा निर्माण झाला.
सत्येंद्रने नीलेशचा फोन तपासण्याचा अनेक वेळा प्रयत्न केला पण नीलेशने त्याला तिचा फोन तपासू दिला नाही. 28 मे रोजी, नीलेश दिल्लीच्या त्रिलोकपुरी भागात सत्येंद्रला भेटण्यासाठी गेली जिथे नीलेशने सत्येंद्रला 5.50 लाख रुपये परत करण्यास सांगितले, पण सत्येंद्रने गाडी खरेदी केल्याचे सांगून पैसे द्यायला नकार दिला. सत्येंद्रने पैसे देण्यास असमर्थता व्यक्त केली तेव्हा निलेशने त्याच्यावर दबाव आणला. त्यानंतर, सत्येंद्रला राग आला आणि त्याने दुपट्ट्याने निलेशचा गळा दाबला, ज्यामुळे निलेशचा जागीच मृत्यू झाला.
advertisement
सत्येंद्रने निलेशचा मृतदेह घरात ठेवलेल्या राखाडी सुटकेसमध्ये भरला आणि रात्र होण्याची वाट पाहत राहिला. रात्री 9 वाजता, त्याने विनोद नगर परिसरातील रस्त्याच्या बाहेर आपली गाडी उभी केली आणि सुटकेसमध्ये भरलेला मृतदेह गाडीमध्ये टाकला. इथेच सत्येंद्र निलेशचा मृतदेह घेऊन जाताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी, सत्येंद्र दिल्ली ते मुरादाबाद या राष्ट्रीय महामार्ग 9 वर निघाला. सत्येंद्रला हा मार्ग चांगला माहित होता आणि त्याला माहित होते की मृतदेह हापूर जिल्ह्यात सहजपणे विल्हेवाट लावता येतो.
advertisement
टोल प्लाझापासून वाचण्यासाठी त्याने कालव्याच्या ट्रॅकचा वापर केला आणि एक निर्जन जागा सापडल्यानंतर, तो शिखेरा कालव्याजवळ पोहोचला आणि गाडीतून सुटकेस काढून कालव्यात फेकून दिली. 28 मे रोजी रात्री सत्येंद्रने सुटकेस फेकली. सुमारे 2 दिवस ही सुटकेस कालव्यातच राहिली.
30 मे रोजी रस्त्याने जाणाऱ्यांनी सुटकेसमधून रक्त येताना पाहिले आणि नंतर पोलिसांना माहिती दिली. यानंतर, वरिष्ठ पोलिस अधिकारी देखील घटनास्थळी पोहोचले आणि घटनेचा लवकरच उलगडा करण्यासाठी अनेक पथके तयार केली. हापूर पोलिसांनी हापूर ते दिल्ली असे 500 सीसीटीव्ही कॅमेरे तपासले, दिल्लीतील सीसीटीव्ही फुटेजमध्ये सत्येंद्र मृतदेह सापडलेली राखाडी रंगाची सुटकेस घेऊन जात असल्याचे कैद झाले, त्यानंतर पोलिसांनी सखोल चौकशी केली आणि सत्येंद्रला अटक केली. हापूर पोलिसांनी एका आठवड्यात या ब्लाईंड मर्डरचा उलगडा केला.
view comments
मराठी बातम्या/क्राइम/
Crime : रात्रभर गर्लफ्रेंडचा फोन बिझी, 5.50 लाखांची उधारी अन् संशय, प्रेमाच्या कहाणीचा रक्तरंजित शेवट
Next Article
advertisement
Ajit Pawar:  अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवं वळण, प्रत्यक्षदर्शीच्या हवाल्याने मिटकरींचा खळबळजनक दावा, ''एका व्यक्तीनं विमानातून...''
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवं वळण, प्रत्यक्षदर्शीच्या हवाल्याने मिटकरींचा ख
  • अजित पवार यांच्या विमान अपघाती निधनाने सगळ्या राज्यालाच मोठा धक्का बसला आहे.

  • ष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी विमान अपघात प्रकरणात नवा दावा केला

  • अमोल मिटकरींनी या प्रकरणाला आता 'घातपाता'चे नवे वळण दिले आहे.

View All
advertisement