पहलगाम हल्ला ते शस्त्रसंधी, 18 दिवसांच्या तणावानंतर आता पुढे काय? भारत या दोन देशांना धडा शिकवणार
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
India Pakistan: पहलगाम हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान तणाव वाढला. भारताने पाकिस्तानच्या हवाई तळांवर हल्ला केला. पाकिस्तानने अणुबॉम्बची धमकी दिली. अमेरिकेच्या हस्तक्षेपानंतर शस्त्रसंधी झाली.
पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यापासून ते काल (शनिवारी) अमेरिकेच्या हस्तक्षेपानंतर झालेली शस्त्रसंधीनंतर या सर्व पार्श्वभूमीवर अनेक महत्त्वापूर्ण घडामोडी घडल्या आहेत. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हल्ले थांबले असले तरी दोन्ही देशातील तणाव अद्याप पूर्णपणे संपलेला नाही. २२ एप्रिल पहलगाम हल्ला ते १० मे शस्त्रसंधी या काळातील घटनांचे विश्लेषण करणे गरजेचे आहे.
पाकिस्तानची अमेरिकेकडे मध्यस्थीची याचना आणि अणुबॉम्बची धमकी: पाकिस्तानने अत्यंत हताशपणे अमेरिकेला या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची विनंती केली. इतकेच नव्हे तर अणुबॉम्बच्या वापराची शक्यताही बोलून दाखवल्याने अमेरिकेची चिंता वाढली. सौदी अरेबिया, तुर्की आणि संयुक्त अरब अमिराती यांसारख्या देशांनीही या प्रकरणी आपले मत व्यक्त केले. पाश्चात्त्य माध्यमांच्या वृत्तानुसार या देशांनीही या तणावात लक्ष घातले.
advertisement
भारताची निर्णायक कारवाई आणि पाकिस्तानच्या हवाई तळांचे मोठे नुकसान: भारताने आपली संपूर्ण कारवाई ही वाढत्या संघर्षाला पायबंद घालणारी आणि पाकिस्तानच्या कृत्याला दिलेले प्रत्युत्तर असल्याचे स्पष्ट केले होते. त्यानुसार भारताने पाकिस्तानच्या हवाई तळांवर जोरदार हल्ला चढवून त्यांच्या लढाऊ क्षमतेला मोठे नुकसान पोहोचवले. जर पाकिस्तानने यानंतरही आगळीक केली असती तर त्यांचे अस्तित्वच धोक्यात आले असते.
advertisement
पाश्चात्त्य माध्यमांची दिशाभूल: पाश्चात्त्य माध्यमे भारताच्या कथित विमान नुकसानीवर अधिक लक्ष केंद्रित करत आहेत (ज्याला भारताने अद्याप दुजोरा दिलेला नाही). त्यांना या गोष्टीची अधिक काळजी आहे की चीनच्या प्रणालीने राफेलसारखे विमान कसे पाडले जाऊ शकते. मात्र ही विचारसरणी चुकीची आहे. भारताच्या कारवाईचे मूल्यमापन भारताच्या उद्दिष्टांच्या आधारावर केले पाहिजे.
भारताचे उद्दिष्ट होते:
advertisement
१) पाकिस्तानी दहशतवादी ठिकाणांवर हल्ला करणे (साध्य झाले)
२) सीमा न ओलांडता कारवाई करणे (सीमा ओलांडली नाही)
३) कोणतीही जीवित किंवा मालमत्ता हानी होऊ नये (लक्ष्य साधले).
युद्ध परिस्थितीत काही विमाने गमावली जाऊ शकतात हे गृहीत धरले तरी कोणतेही भारतीय विमान पाकिस्तानात पडले नाही आणि कोणत्याही वैमानिकाचा मृत्यू झाला नाही हे स्पष्ट आहे. याउलट पाकिस्तानची हवाई सुरक्षा प्रणाली पूर्णपणे उद्ध्वस्त झाली. त्यांचे सर्व क्षेपणास्त्रे निष्फळ ठरवण्यात आले आणि त्यांच्या हवाई क्षेत्रांचे मोठे नुकसान झाले. विशेष म्हणजे पाकिस्तानने निष्पाप नागरिकांच्या वस्तीवर हल्ला करण्यास कोणतीही कसर सोडली नाही. त्यांनी शेकडो ड्रोन उडवले पण ते भारतीय हवाई सुरक्षा भेदण्यात अयशस्वी ठरले.
advertisement
ट्रम्प यांच्या भूमिकेमुळे भारतीयांची नाराजी: असे दिसते की भारताने कदाचित अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे ऐकले आणि त्यांना युद्ध थांबवण्याचे श्रेय मिळवून देण्यात मदत केली. मात्र ट्रम्प यांनी केलेल्या पोस्टमुळे भारतीयांमध्ये मोठी नाराजी पसरली आहे. त्यांनी पहलगाम हल्ल्याबाबत भारतीयांची तीव्र भावना आणि राग समजून घेतला नाही. गेल्या वर्षी जेव्हा अनेक लोक त्यांच्या विजयासाठी प्रार्थना करत होते. तेव्हा भारत त्या मोजक्या देशांपैकी एक होता ज्यांना वाटत होते ट्रम्प जिंकावेत. मात्र ट्रम्प यांनी भारताची तुलना पाकिस्तानसारख्या बेजबाबदार आणि अविश्वसनीय देशाशी करून भारतीयांचा विश्वास आणि सद्भावना गमावली आहे.
advertisement
भारताने प्रस्थापित केली अणुबॉम्ब हल्ल्याची नवी मर्यादा: भारताने पाकिस्तानविरुद्ध कारवाई करताना अणुबॉम्ब हल्ल्याची एक नवीन उप-मर्यादा निश्चित केली आहे. यापूर्वीचे सर्जिकल स्ट्राईक आणि बालाकोट हल्ल्यांनीही मर्यादा वाढवल्या होत्या. पण ही कारवाई अधिक महत्त्वपूर्ण आहे. कारण भारताने पाकिस्तानच्या आत खोलवर घुसून त्यांच्या लष्करी मालमत्तेला, ज्यात त्यांच्या प्रतिष्ठित तळांचाही समावेश आहे. क्षेपणास्त्रांचा वापर करून उद्ध्वस्त केले. भारताने आपल्या कठोर हल्ल्यांनी पाकिस्तानच्या अणुबॉम्बच्या धोक्याला न जुमानणारे आपले सामर्थ्य दाखवून दिले.
advertisement
विश्वासघातावर कारवाईची गरज: आता तुर्कीकडे पाहणे महत्त्वाचे आहे. ज्यांनी उघडपणे पाकिस्तानला पाठिंबा दर्शविला. विशेष म्हणजे भारताने त्यांच्या गरजच्या वेळी मदत पाठवली असून देखील आणि दरवर्षी ३ लाखांहून अधिक भारतीय पर्यटक त्यांच्या पर्यटन अर्थव्यवस्थेला मोठा हातभार लावतात. अझरबैजानचेही तसेच आहे. सरकार या दोन्ही देशांवर कारवाई करण्याचा विचार करत आहे का? विमान उड्डाणे थांबवणे किंवा पर्यटन कंपन्यांवर दबाव आणणे यासारख्या उपायांचा विचार केला जाऊ शकतो का?
या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध अधिक तणावपूर्ण झाले आहेत. भारताने दाखवलेल्या धैर्यामुळे आणि निर्णायक कारवाईमुळे पाकिस्तानला मोठा धक्का बसला आहे. तर दुसरीकडे आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताच्या भूमिकेकडे लक्ष वेधले गेले आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
May 11, 2025 4:24 PM IST
मराठी बातम्या/Explainer/
पहलगाम हल्ला ते शस्त्रसंधी, 18 दिवसांच्या तणावानंतर आता पुढे काय? भारत या दोन देशांना धडा शिकवणार