जेवल्यानंतर फक्त 10 मिनिट करा हे काम, आरोग्य राहिल 'फुल टू स्ट्रॉग'
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
आरोग्य ही प्रत्येकासाठी महत्त्लाची गोष्ट आहे. त्यामुळे आरोग्याची व्यवस्थित काळजी घेणं गरजेचं असतं. आरोग्यच चांगलं नसेल तर बाकीच्या कितीही गोष्टी चांगल्या असल्या तरी काही उपयोगाच्या नाहीत.
नवी दिल्ली : आरोग्य ही प्रत्येकासाठी महत्त्लाची गोष्ट आहे. त्यामुळे आरोग्याची व्यवस्थित काळजी घेणं गरजेचं असतं. आरोग्यच चांगलं नसेल तर बाकीच्या कितीही गोष्टी चांगल्या असल्या तरी काही उपयोगाच्या नाहीत. खाण्यापिण्यानंतरही आरोग्य व्यवस्थित राखणं गरजेचं आहे. जेवण केल्यानंतर, काहीही खाल्ल्यानंतर लगेच बसायचं नसतं किंवा झोपायचं नसतं असं म्हटलं जातं. नाहीतर आरोग्यावर वाईट परिणाम होतो. जेवणानंतर हलचाल गरजेची असते.
जेवणानंतर 10 मिनिट एक गोष्ट नियमित केली तर हेल्थ चांगली राहिल. आजारांपासून दूर राहाल. ही महत्त्वाची गोष्ट कोणती आहे? जेवणानंतर 10 मिनिट चालणं ही गरजेची आणि महत्त्वाची गोष्ट आहे. यामुळे अनेक आजारांचा धोका कमी होतो.
TOI च्या रिपोर्टनुसार, जेवणानंतर थोड्यावेळ चालणं गरजेचं आहे. चालण्यामुळे पचनक्रिया चांगली होते. यासोबत पोटाचे मसल्य एक्टिव्ह होतात. यामुळे पोटही कमी होतं आणि जेवण पचतंही. हेल्थ एक्सपर्टनुसार, चालल्यामुळे ग्लूकोज लेवल कंट्रोल करण्यात मदत होते. चालण्यामुळे इंसुलिन सेंसिटिव्हिटी सुधारते. कॅलरीज बर्न होतात. मधुमेहाच्या रुग्णांनी तर दररोज 10 मिनिट चालणं गरजेचं आहे.
advertisement
दरम्यान, तुम्हाला ऑलरेडी काही आजार असतील किंवा कशाचा त्रास होत असेल तर डॉक्टरच्या सल्ल्याने तुम्ही व्यायाम किंवा त्यावर उपाय घेऊ शकतात. कारण तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय काही उपाय करणे, गोळ्या खाणे हानिकारक ठरु शकतं.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 08, 2024 1:50 PM IST


