Health Tips : डोळ्यांच्या मधे का दुखतं ? वात - अपुऱ्या झोपेचं काय आहे कनेक्शन ? आयुर्वेदात सांगितलेत उपाय
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
शरीरात वात वाढल्यानं असे परिणाम जाणवू शकतात. शरीरात वात वाढणं आणि झोपेची कमतरता हे एकमेकांशी संबंधित असल्याचं आयुर्वेदात म्हटलंय. शरीरात वात वाढतो तेव्हा झोपेवर परिणाम होतो आणि झोपेचा अभाव संपूर्ण मज्जासंस्थेवर परिणाम करतो, ज्यामुळे डोकेदुखी, वेदना आणि डोळ्यांमधे जडपणा येतो.
मुंबई : डोकेदुखी विविध कारणांनी होते. बऱ्याचदा, स्क्रीनवर सतत जास्त वेळ काम केल्यानं किंवा मोबाईलचा जास्त वापर केल्यानं डोकेदुखी होते, पण प्रत्येक डोकेदुखी केवळ स्क्रीनचा जास्त वेळ वापर केल्यानंच होते असं नाही.
काहींना सकाळी उठल्यावर डोकं जड झाल्यासारखं वाटतं. भुवयांच्या मधे दुखतं. याचं कारण झोपेचा अभाव आणि त्यामुळे होणारं न्यूरो-हार्मोनल असंतुलन असू शकतं. डोळ्यांच्या वरचा भुवयांचा भाग फ्रंटल सायनस आणि ट्रायजेमिनल नर्व्हशी जोडलेला असतो.
झोप अपुरी असते तेव्हा, भुवयांच्या मधे तीव्र वेदना होतात, ज्यामुळे मेंदूमधे असलेल्या सेरोटोनिन आणि मेलाटोनिन हार्मोन्सचं संतुलन देखील बिघडतं. ज्यामुळे डोकेदुखीसह डोळ्यांच्या स्नायूंवर ताण वाढतो.
advertisement
शरीरात वात वाढल्यानं असे परिणाम जाणवू शकतात. शरीरात वात वाढणं आणि झोपेची कमतरता हे एकमेकांशी संबंधित असल्याचं आयुर्वेदात म्हटलंय. शरीरात वात वाढतो तेव्हा झोपेवर परिणाम होतो आणि
झोपेचा अभाव संपूर्ण मज्जासंस्थेवर परिणाम करतो, ज्यामुळे डोकेदुखी, वेदना आणि डोळ्यांमधे जडपणा येतो. आयुर्वेदात या समस्येवर अनेक सोपे उपाय सांगण्यात आलेत.
नस्य पद्धत - पहिली पद्धत म्हणजे नस्य पद्धत. रात्री झोपण्यापूर्वी नाकात शुद्ध तुपाचे काही थेंब टाका. यामुळे नाक बंद होणं कमी होतं आणि श्वास घेण्यास त्रास कमी होतो.
advertisement
तळव्याचं मालिश - पायांच्या तळव्यांवर अनेक प्रेशर पॉइंट्स असतात जे शरीराला अनेक फायदे देतात आणि यामुळे झोपण्यास मदत होते. रात्रीच्या वेळी तळव्याला मालिश केल्यानं थकवा कमी होतो आणि विषारी पदार्थ बाहेर पडतात.
डोकेदुखी कमी करण्यासाठी ब्राह्मी किंवा जटामान्सी देखील वापरण्याची शिफारस केली जाते. यामुळे, मन शांत होतं आणि सहज आणि शांत झोप येते.
advertisement
याव्यतिरिक्त, त्रिफळा पाण्यानं डोळे धुतल्यानं देखील आराम मिळतो. त्रिफळा थंड पाण्यात मिसळून डोळे धुण्यानं डोळ्यांचा थकवा कमी होईल.
रात्रीच्या वेळी हळद, काळी मिरी आणि जायफळ घातलेलं दूध प्यायल्यानं झोप येते आणि मन शांत होण्यास मदत होते. रात्रीच्या वेळी हे दूध प्यायल्यानं शरीर आणि मनाला शांती मिळते आणि शरीराला ऊर्जा मिळते.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 14, 2026 9:17 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Health Tips : डोळ्यांच्या मधे का दुखतं ? वात - अपुऱ्या झोपेचं काय आहे कनेक्शन ? आयुर्वेदात सांगितलेत उपाय






