advertisement

घोडबंदर रोडच्या ट्रॅफिकमुळे मी मेलो तर...

Last Updated:

माझ्या मृत्यूनंतर घोडबंदर रोडला माझं नाव देणार असाल तर माझा उल्लेख, ‘अभिनेता’ अभिजीत केळकर असा न करता ‘चांद्र मोहीमवीर’ अभिजीत केळकर असा करावा ही विनंती...’

अभिनेता अभिजीत केळकर
अभिनेता अभिजीत केळकर
ठाणे: गेल्या काही महिन्यांपासून ठाणेकरांना प्रचंड मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय. ठाण्यातल्या महत्त्वाच्या जंक्शनवर वाहतूक कोंडी ही नित्याचीच झालीये. एकेकाळी ठाण्याचं एक्सटेन्शन अशी ओळख असलेल्या घोडबंदर रोडची वाहतूक कोंडीमुळे पुरती वाट लागलीये. पावसामुळे खड्डेमय झालेले रस्ते, सुरू असलेली मेट्रोची कामं आणि महत्वाचं म्हणजे घोडबंदर परिसरात वाढलेली तुफान लोकवस्ती यामुळे घोडबंदर रोडची ओळख 24 तास रहदारीचा रस्ता अशी झालीये. मात्र गेल्या काही दिवसांपासून घोडबंदरवासीयांना वाहतूक कोंडीचा प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतोय. वाहतूक कोंडीवर सर्वसामान्य नागरिक संताप व्यक्त करत असतानाचा आता अभिनेता अभिजीत केळकरनेही फेसबुक पोस्ट करत आपल्या संतापाला वाट व्यक्त करून दिलीये.
आपल्या पोस्टमध्ये अभिजीत म्हणतो, ‘आज शूटिंगचा साडेआठचा कॉल टाईम होता. साडेसात वाजता घरून गुगल मॅप बघून निघालेलो मी दीड तासापासून घोडबंदर रोडवरच्या घाटाच्याही बराच आधी असलेल्या शेल पेट्रोल पंपच्या इकडे बंपर टू बंपर ट्रॅफिक मध्ये अडकलो आहे.  ट्राफिक कधी सुटणार ? शूटिंगला आपण कधी पोहोचू शकणार ? हे माहीत नाही, ह्या केऑटिक सिच्युएशनमध्ये घाणेरड्या रस्त्यांमुळे आणि बेशिस्त ट्रक ड्रायव्हर्समुळे, एखादा ट्रक किंवा ट्रॉलर उलटून त्याच्याखाली माझा मृत्यू झालाच आणि माझ्या पश्चात त्या स्पॉटला चुकून माकून माझं नाव द्यायचा विचार झालाच तर माझा उल्लेख, "अभिनेता" अभिजीत केळकर असा न करता "चांद्र मोहीमवीर" अभिजीत केळकर असा करावा ही विनंती...’
advertisement
जसंजसं ठाणं वाढू लागलंय तसतसं ठाण्याची ओळख बदलू लागलीये. सुरूवातीला मढ आयलंड आणि गोरेगाव फिल्मसिटी पुरता मर्यादित असलेलं मराठी मालिकांचं शुटिंग घोडबंदर परिसरात होऊ लागलंय. अनेक मोठे स्टुडिओज या भागात उभारले गेलेत. अनेक अभिनेते, दिग्दर्शक शुटींगसाठी ठाणे गाठत असतात. मात्र घोडबंदर रोडच्या वाहतूक कोंडीमुळे त्यांनी ठाण्यापासून दूर राहणं पसंद केलंय.
advertisement
खड्डेमय घोडबंदरचा उल्लेख अंतराळ
संतापलेल्या अभिजितने काही दिवसांपूर्वी अशीच एक पोस्ट फेसबुकवर टाकली होती. ‘ठाण्यातील एक अतिशय महत्त्वाचा आणि बारा महिने, चोवीस तास रहदारीचा असलेला घोडबंदर रोड... गेली अनेक वर्ष, त्यावरील अत्यंत निकृष्ट दर्जाच्या रस्त्यांच्या कामामुळे चर्चेत असतो...दोन्ही बाजूच्या गाड्या, heavy ट्रक्स, ट्रॉलर्स रोज येऊन घाटात अडतातच, त्यात इथे स्ट्रीट लाइट्सही नाहीत त्यामुळे अनेकदा अपघातही होतात, त्यामुळे वाहनं अडतात ते वेगळंच... रोज अक्षरशः जीव मुठीत घेऊनच इथून प्रवास करावा लागतो... मी ही काही वर्षांपूर्वी याच ठिकाणी, बाईक accident मधे, मरता मरता वाचलो होतो पण अजूनही परिस्थिती बदललेली नाही... निवडणुका आल्या-गेल्या, येतील-जातील, तसेच जीवही गेले, जातील आणि अंतराळातला हा प्रवास असाच अव्याहत सुरू राहील.’
advertisement
view comments
मराठी बातम्या/Travel/
घोडबंदर रोडच्या ट्रॅफिकमुळे मी मेलो तर...
Next Article
मोबाईल रिचार्जमध्ये मोठा बदल, सरकारने टेलिकॉम कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश; महिन्याच्या Rechargeमध्ये मिळणार इतके दिवस
मोबाईल रिचार्जमध्ये मोठा बदल, सरकारने टेलिकॉम कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश; महिन्याच्या Rechargeमध्ये मिळणार इतके दिवस
  • मोबाइल रिचार्जच्या 'लफड्या'वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय

  • महिनाभराच्या रिचार्जमध्ये मिळणार इतके दिवस

  • नवे नियम वाचा

View All
advertisement