Monsoon Trekking Tips: पावसाळ्यात फिरायला जायचं प्लॅनिंग करताय? या गोष्टींची आवश्य घ्या काळजी, ट्रिप होईल भन्नाट
- Published by:Mohan Najan
- Reported by:Bhavna Arvind Kamble
Last Updated:
पावसाळा हा निसर्गप्रेमींसाठी पर्वणी मानला जातो. दरवर्षी पावसाळ्यात पुर, भूस्खलन, घसरणाऱ्या रस्त्यांमुळे अपघात होतात. त्यामुळे निसर्गाच्या सहवासात रमताना सावधगिरी बाळगणं अत्यंत आवश्यक आहे.
मुंबई : पावसाळा हा निसर्गप्रेमींसाठी पर्वणी मानला जातो. आकाशातून पडणाऱ्या सरी, हिरव्यागार डोंगरदऱ्या, धबधबे आणि समुद्रकिनाऱ्यांचं नटलेलं रूप पाहण्यासाठी अनेक पर्यटक विशेषतः या ऋतूतच भटकंती करतात. मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रातले अनेक नैसर्गिक स्थळं यावेळी जिवंत वाटू लागतात. मात्र, या सौंदर्याच्या मागे धोक्याचं सावट देखील लपलेलं असतं. दरवर्षी पावसाळ्यात पुर, भूस्खलन, घसरणाऱ्या रस्त्यांमुळे अपघात होतात. विशेषतः अचानक आलेल्या पावसामुळे नद्यांना पूर येतो, धबधक्यांचा प्रवाह बळावतो, आणि जंगलात अडकण्याच्या घटना घडतात. त्यामुळे निसर्गाच्या सहवासात रमताना सावधगिरी बाळगणं अत्यंत आवश्यक आहे. याबद्दलचं अनुभवी ट्रेकर दिवाकर साटम यांनी माहिती दिली आहे.
सुरक्षिततेसाठी आवश्यक खबरदारी कशी घ्यावी?
पावसाच्या सरी जोरात असताना नद्यांजवळ, धबधक्यांजवळ किंवा समुद्रकिनाऱ्यावर जाणं टाळा. डोंगराळ भागात भूस्खलनाची शक्यता अधिक असते, त्यामुळे घाटात गाडीने जाताना काळजी घ्या. मोबाईल नेटवर्क नसलेल्या ठिकाणी जाताना घरच्यांना किंवा मित्रांना आधीच माहिती द्या. हवामान खात्याचा अंदाज बघूनच सहलीचं नियोजन करा.
advertisement
अतिवृष्टी होणारे भाग कोकणातील काही धबधबे, भातसा धरण परिसर घसरट डोंगरदऱ्या आणि अरुंद घाटमार्ग विशेषतः सह्याद्रीतील काही ट्रेकिंग पॉइंट्स. गर्दीची ठिकाणं जिथे आपत्कालीन मदत मिळणं कठीण होऊ शकतं अशा ठिकाणी जाऊ नये, असं अनुभवी ट्रेकर दिवाकर साटम सांगतात.
फिरायला जाताना तुमच्याकडे या वस्तू असायलाच हव्यात
पाणीरोधक रेनकोट आणि बॅग कव्हर पावसाच्या जोरदार सरींपासून स्वतःसह तुमच्या साहित्यानं सुरक्षित राहण्यासाठी असायला हव्यात. डोंगराळ आणि ओले रस्ते पार करताना पकड चांगली मिळावी म्हणून भक्कमव घसरणार नाहीत असे शूज हवेत. टॉर्च (अत्यावश्यक) जंगलात किंवा कमी प्रकाशाच्या ठिकाणी अंधारात अडचण येऊ नये असायला हवी. प्राथमिक उपचार पेटी (फर्स्ट-एड किट) किरकोळ जखम, कीटक चावणे किंवा थकवा यासाठी पाहिजेत.
advertisement
ओळखपत्र आणि काही रोख रक्कम आपत्कालीन परिस्थितीत उपयोगी पढेल म्हणून पॉवर बँक मोबाइलचे नेटवर्क कमी असले तरी फोन सतत चालू ठेवण्याची गरज असते. सुकवलेले खाण्याचे पदार्थ (बिस्किटं, ड्रायफ्रुट्स) अनपेक्षित अडथळा आल्यास उर्जेचा स्रोत. पाण्याची बाटली व पाण्याचे टॅबलेट्स (किंवा फिल्टर) स्वच्छ पाणी मिळेलच याची खात्री नसते. प्लॅस्टिक पिशव्या भिजू नये अशा वस्तू ठेवण्यासाठी घ्यावयात तसेच कचरा गोळा करण्यासाठी एक छोटी पिशवी सोबत ठेवावी. ज्यामुळे पर्यावरणाची काळजी घेतली जाईल.
advertisement
पावसाळा निसर्गाचा उत्सव असला, तरी आनंदात सुरक्षिततेचं भान ठेवणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे. योग्य माहिती, योग्य तयारी आणि जबाबदारीनं वागणं हाच खऱ्या अर्थानं पावसाळ्याचा आनंद घेण्याचा मार्ग आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
June 03, 2025 7:50 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/Travel/
Monsoon Trekking Tips: पावसाळ्यात फिरायला जायचं प्लॅनिंग करताय? या गोष्टींची आवश्य घ्या काळजी, ट्रिप होईल भन्नाट