advertisement

बारामतीत अपघात, बंगळुरूत तक्रार; अजित पवार अपघात प्रकरणी दाखल झालेली झिरो FIR नेमकी आहे तरी काय?

Last Updated:

महाराष्ट्रात आमदार रोहित पवारांची तक्रार नोंदवून घेतली जात नव्हती, त्यामुळे बंगळुरूत तक्रार नोंदवण्यात आली आहे.

Ajit pawar plane accident
Ajit pawar plane accident
मुंबई :  दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणाला आता नवं वळण मिळालंय. कर्नाटकात दाखल झालेली झिरो एफआयआर आता महाराष्ट्र पोलिसांकडे वर्ग करण्यात आलाय. महाराष्ट्रात आमदार रोहित पवारांची तक्रार नोंदवून घेतली जात नव्हती. त्यामुळे बंगळुरूत तक्रार नोंदवण्यात आलीय. पण ही झीरो एफआयआर नेमकी काय आहे हे जाणून घेऊया
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणात आमदार रोहित पवारांनी बंगळुरूत तक्रार नोंदवल्यानंतर ‘झीरो एफआयआर’ दाखल करण्यात आली. महाराष्ट्रात तक्रार नोंदवली जात नसल्याचा आरोप रोहित पवारांनी केला होता. त्यामुळे ही तक्रार इतर राज्यात नोंदवण्याचा सल्ला राहुल गांधींनी दिल्यानंतर रोहित पवारांनी बंगळुरूत जाऊन तक्रार नोंदवली.  त्यानंतर कर्नाटकच्या डीजीपींनी झीरो एफआयआर महाराष्ट्राच्या डीजीपींकडे वर्ग केलाय. अपघात बारामती परिसरात घडल्यानं बारामती ग्रामीण पोलिसांकडे तपासासाठी सुपूर्द करण्यात येणार आहे.
advertisement

एफआयआरमध्ये अत्यंत गंभीर आरोप

दरम्यान, एफआयआरमध्ये अत्यंत गंभीर आरोप करण्यात आले आहेत. हा अपघात केवळ तांत्रिक बिघाड नसून "मोठा गुन्हेगारी कट" असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहितेअंतर्गत खून, निष्काळजीपणामुळे मृत्यू, कटकारस्थान, पुरावे नष्ट करणे आणि बनावट कागदपत्र तयार करणे यांसारख्या गंभीर कलमांचा समावेश करण्यात आला

झीरो एफआयआर म्हणजे काय?

advertisement
झीरो एफआयआर म्हणजे गुन्हा ज्या ठिकाणी घडला आहे. त्या हद्दीत नसलेल्या पोलीस ठाण्यातही तक्रार नोंदवण्याची सुविधा असते. अशा एफआयआरला ‘0’ क्रमांक दिला जातो आणि नंतर संबंधित पोलीस ठाण्याकडे तो वर्ग केला जातो.
विमान अपघातानंतर बारामती पोलिसांकडे अपघाती मृ्त्यूची नोंद करण्यात आली होती. बंगळुरूतील झीरो एफआयआर बारामती पोलिसांकडे वर्ग झाल्यानंतर आता तपासात काय समोर येतं, याकडे राज्याचं लक्ष लागलंय.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
बारामतीत अपघात, बंगळुरूत तक्रार; अजित पवार अपघात प्रकरणी दाखल झालेली झिरो FIR नेमकी आहे तरी काय?
Next Article
IPLमधील 'डील'चे गूढ! संघाची 15,300 कोटींना विक्री; फक्त जुना मालक नाही, BCCIला देखील मिळाले पैसे, गणित वाचून चक्रावून जाल
IPLमधील 'डील'चे गूढ! संघाची 15,300 कोटींना विक्री; जुना मालक नाही, BCCIला देखील मिळाले पैसे, गणित वाचून चक्रावून जाल
  • राजस्थान रॉयल्सची 15,300 कोटींना विक्री

  • मालकाच्या खिशात 3,000 कोटी कमी का?

  • BCCIला किती मिळाले? चक्रावून टाकणारे गणित

View All
advertisement