PM Narendra Modi : विरोधकांच्या नरेटिव्हला PM मोदींचं उत्तर, संविधानावरून 'डबल डोस', विदर्भात काँग्रेसवर हल्लाबोल
- Published by:Suraj
Last Updated:
PM Narendra Modi In Chimur : विरोधकांचे नरेटिव्ह बदलण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रचारसभांमध्ये काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल सुरू केला आहे. संविधान आणि काश्मीरमधील कलम ३७० वरून त्यांनी काँग्रेसवर टीका केली.
चंद्रपूर : विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. महाराष्ट्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी विदर्भ दौऱ्यावर असून महायुतीच्या उमेदवारांसाठी चिमूरमध्ये सभा झाली. लोकसभा निवडणुकीत विरोधकांकडून संविधान बदलण्याच्या आरोपामुळे आपल्याला फटका बसला असा दावा सातत्याने भाजपकडून केला जातोय. विरोधकांचे हे नरेटिव्ह बदलण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रचारसभांमध्ये काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल सुरू केला आहे. काश्मीरमध्ये कलम ३७० हटवणं, बाबासाहेब आंबेडकर आणि संविधान यांचा उल्लेख करत काँग्रेसवर टीका करत आहेत. चिमूर इथं झालेल्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर टीका करताना कलम ३७० काँग्रेसची देणगी असून त्यामुळे देशात दोन संविधान होते असा आरोप केला.
काश्मीरमधील कलम ३७० चा मुद्दा आणि देशात दोन संविधान याला काँग्रेसच जबाबदार असल्याचं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चिमूर इथल्या सभेत जोरदार हल्लाबोल केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, जम्मू आणि काश्मीर दशकांपर्यंत फुटीरतावाद आणि दहशतवादाच्या आगीत धुमसत होता. कित्येक जवान शहीद झाले. ही अवस्था कशामुळे झाली? ज्या कायद्याच्या आडून हे सगळं झालं ते कलम ३७० आम्ही हटवलं. ते कलम काँग्रेसने आणलं होतं. ते संपवताच काश्मीरला भारत आणि भारताच्या संविधानाशी जोडलं.तोपर्यंत देशात दोन संविधान होते.
advertisement
जम्मू काश्मीरमध्ये गेल्या ७ दशकांपासून बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान लागू नव्हतं. तुम्ही मला जनादेश दिलात आणि आम्ही कलम ३७० कायमचं हटवलं. पण काँग्रेस आणि आघाडीला हे पचलं नाही. काश्मीरमध्ये सत्ता येताच त्यांनी कलम ३७० पुन्हा आणण्यासाठी हालचाली सुरू केल्या असल्याचंही नरेंद्र मोदींनी म्हटलं.
advertisement
राज्याचा वेगाने विकास करणं ही आघाडीवाल्यांच्या हातची गोष्ट नाही. त्यांनी विकासाला ब्रेक लावण्यात पीएचडी केलीय. कामं अडकवणं आणि ती दुसरीकडे नेण्यात त्यांची डबल पीएचडी आहे. अडीच वर्षात मेट्रो, वाढवण पोर्ट, समृद्धीी महामार्ग रोखण्याचा प्रयत्न केला. आघाडी म्हणजे भ्रष्टाचाराचे सर्वात मोठे खिलाडी.त्यांना पुन्हा लुट करायला देणार का? महाराष्ट्राच्या प्रगतीला ब्रेक लावू देणार का? असा प्रश्न विचारत पंतप्रधान मोदींनी म्हटलं की, काँग्रेस आणि त्यांचे सहकारी पक्ष हिंसा आणि फुटीरतावादावर राजकीय भाकऱ्या भाजतात.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 12, 2024 1:52 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
PM Narendra Modi : विरोधकांच्या नरेटिव्हला PM मोदींचं उत्तर, संविधानावरून 'डबल डोस', विदर्भात काँग्रेसवर हल्लाबोल


