Mumbai Rain : मुंबईकरांनो सतर्क राहा, पुढील 3 तास महत्वाचे,मंत्रालयातून आले थेट आदेश

Last Updated:

शनिवारी मध्यरात्रीपासून मुसळधार पावसाने मुंबई, वसई-विरार, पालघर,ठाणे,रायगड या जिल्ह्यांना झोडपले आहे.यानंतर आज रविवार संध्याकाळपर्यंत देखील पावसाचा जोर कायम आहे.

mumbai rain
mumbai rain
Mumbai Rain News : शनिवारी मध्यरात्रीपासून मुसळधार पावसाने मुंबई, वसई-विरार, पालघर,ठाणे,रायगड या जिल्ह्यांना झोडपले आहे.यानंतर आज रविवार संध्याकाळपर्यंत देखील पावसाचा जोर कायम आहे. याउलट आता हवामान विभागाने या जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. या जिल्ह्यांसाठी पुढील तीन तास महत्वाचे आहेत.कारण पुढील काही तासात मुसळधार पावसाची शक्यता आहे.त्यामुळे नागरीकांनी काळजी घ्यावी,असे आवाहन करण्यात आले आहे.
30 सप्टेंबरपर्यंत धोक्याचा इशारा
भारतीय हवामान विभागाकडून 30 सप्टेंबरपर्यंत राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची तीव्रता वाढण्याचा इशारा देण्यात आला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. तर मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना जोरदार पावसामुळे शहरी पुराच्या धोका असल्याचे राज्य आपत्कालीन केंद्राने सांगितले आहे.
नागरिकांनी अधिकृत सूचनांचे पालन करावे. धोकादायक भागात जाणे टाळावे. पूरप्रवण क्षेत्रात जाणे टाळावे. वीज पडत असताना झाडाखाली थांबणे टाळावे. पुरापासून बचावासाठी अत्यावश्यक सर्व बाबींची काळजी घ्यावी. पुराच्या आपत्तीपासून वाचण्यासाठी स्थानिक निवारा केंद्राचे सहाय्य घ्यावे, पूर परिस्थितीत अनावश्यक पर्यटन टाळावे. पूर परिस्थितीत नदी नाल्यांच्या पुलावरुन पाणी जात असताना रस्ता ओलांडू नये तसेच अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन करण्यात आले आहे.
advertisement
सतर्कतेचा सूचना :
घाट परिसरात लहान मोठ्या दरडी कोसळण्याची शक्यता आहे. तसेच Flash Flood चा धोका निर्माण होऊ शकतो. नद्यांच्या प्रवाहावर सतत लक्ष ठेवून आवश्यक कार्यवाही करावी.
सर्व जिल्ह्यांमध्ये नियंत्रण कक्ष २४x७ कार्यरत ठेवावे.
सखल भागात पाणी उपसा पंप तैनात करणे. त्याचप्रमाणे कमी उंचीच्या भागांचे निरीक्षण ठेवून आवश्यक कार्यवाही करावी. धोकादायक आणि जुन्ह्या इमारतीवर CSSR च्या दृष्टिने आवश्यक उपाययोजना कराव्यात.
advertisement
वीज व रस्ते पायाभूत सुविधा: दुरुस्ती पथक, साखळी आरें व फिडर संरक्षण युनिट तैनात करावे.
धरन निरीक्षण: कोकण व वरच्या खोऱ्यातील मध्यम धरनांसाठी दररोज आदळवा घेण्यात यावा.
जनतेसाठी माहिती प्रसार: आपत्ती पूर्व सूचना SMS, सोशल मीडिया व स्थानिक माध्यमांद्वारे प्रसारित करण्यात येत असून, त्यानुसार नागरिकांनी सतर्क राहावे.
जिल्हा व संपर्क क्रमांक
१. धाराशिव - ०२४७२-२२७३०१ २. सोलापूर - ०२१७-२७३१०१२
advertisement
३. बीड - ०२४४२-२९९२९९ ४. अहिल्यानगर - ०२४१-२३२३८४४
५. परभणी - ०२४५२-२२६४०० ६. नांदेड - ०२४६२-२३५०७७
७. लातूर - ०२३८२ २२०२०१ ८. रायगड - ८६५७७५२४६३
९. रत्नागिरी - ७०५७२२२३३३ १०. पालघर- ०२५२५ २९६०७४
११. सिंधुदुर्ग- ०२३६२ २२८८४७ १२. ठाणे- ९७६७३३८८२७
१३. पुणे - ९३७१०९६००६१ १४. सातारा- ०२१६२ २३२३४९
१५. मुंबई शहर आणि उपनगर- ९९६७ ०२२ ६९४०३३४४.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Mumbai Rain : मुंबईकरांनो सतर्क राहा, पुढील 3 तास महत्वाचे,मंत्रालयातून आले थेट आदेश
Next Article
advertisement
Guess Who: 15 व्या वर्षी घरातून पळाली, नशेच्या आहारी गेली; आज कोट्यवधींची मालकीण आहे ही अभिनेत्री
15व्या वर्षी घरातून पळाली, नशेच्या आहारी गेली; आज अभिनेत्री कोट्यवधींची मालकीण
    View All
    advertisement