Navi Mumbai Fire : नवी मुंबईच्या आगीच्या घटनेत मोठी अपडेट, दिवाळीत जीव गमावलेल्या 'त्या' चौघांच्या मृत्युचं खरं कारण समोर

Last Updated:

दिवाळीत नवी मुंबईच्या वाशीतील रहेजा रेसिडेन्सी इमारतीतील दहाव्या आणि बाराव्या मजल्यावर आगीची धक्कादायक घटना घडली होती. या घटनेत चार जणांचा मृत्यू झाला होता.

navi mumbai
navi mumbai
Navi Mumbai Fire News : विश्वनाथ सावंत,नवी मुंबई : दिवाळीत नवी मुंबईच्या वाशीतील रहेजा रेसिडेन्सी इमारतीतील दहाव्या आणि बाराव्या मजल्यावर आगीची धक्कादायक घटना घडली होती. या घटनेत चार जणांचा मृत्यू झाला होता.यामध्ये एक वृद्ध महिला आणि कुटुंबियांचा समावेश होता.या घटनेने ऐन दिवाळीत हळहळ व्यक्त करण्यात आली होती.आता या प्रकरणात अग्निशमन दलाचा प्राथमिक अहवाल समोर आला आहे. या अहवालात या चौघांच्या मृत्यूच खरं कारण समोर आलं आहे.
अग्निशमन दलाच्या प्राथमिक अहवालानुसार, बी-विंगमधील दहाव्या मजल्यावर राहणाऱ्या जैन कुटुंबाच्या फ्लॅटमध्ये शॉर्टसर्किट झाल्याने आग लागली होती. त्यावेळी वाऱ्याचा वेग अधिक असल्याने काही क्षणांतच आगीचा भडका उडाला. त्यामुळे आग वरच्या अकराव्या आणि बाराव्या मजल्यापर्यंत पसरली.
बाराव्या मजल्यावरील फ्लॅटच्या बाहेर केलेल्या इंटिरियरला आग लागून ती अधिक भडकली. या दरम्यान दहाव्या मजल्यावरील आणि बाराव्या मजल्यावरील दोन्ही फ्लॅटमधील एसी सिलेंडरचा स्फोट झाल्याचंही अहवालात निष्पन्न झालं आहे.या भीषण दुर्घटनेत चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे . दहाव्या मजल्यावरील 84 वर्षीय कमला जैन, तसेच बाराव्या मजल्यावरील एकाच कुटुंबातील 40 वर्षीय पूजा राजन, त्यांचे 42 वर्षीय पती सुंदर बालकृष्णन आणि सहा वर्षांची चिमुकली वेदिका यांचा यात समावेश आहे.
advertisement
अग्निशमन दलाच्या मते, संबंधित इमारतीतील आग नियंत्रण यंत्रणा नीट कार्यरत नसल्याने आगीवर प्राथमिक नियंत्रण मिळवण्यात विलंब झाला. शिवाय दिवाळी दर्शन विद्युत घोषणा केली होती , त्यामुळे आगीचा प्रसार झपाट्याने झाला आणि हानी अधिक झाल्याचं म्हटलं आहे.
नेमकं काय घडलेलं?
ऐन दिवाळीत नवी मुंबईत दोन आगीच्या घटना घडल्या होत्या. या दोन्ही घटनांनी नवी मुंबई हादरली आहे. या दोन्ही घटना रात्रीच्या सुमारास घडल्याची माहिती आहे. पहिली घटना ही नवी मुंबईच्या वाशीतील रहेजा रेसिडेन्सीमध्ये घडली होती. दहाव्या आणि बाराव्या मजल्यावर रात्रीच्या सुमारास ही आगीची घटना घडली होती. या दुर्घटनेत चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. यामध्ये दहाव्या मजल्यावर राहणाऱ्या 80 वर्षीय कमला जैन तसेच बाराव्या मजल्यावरील एकाच कुटुंबातील तीन सदस्यांचा समावेश होता.या सुंदर बालकृष्णन (40), पत्नी पूजा राजन (40) आणि वेदीका या सहा वर्षीय चिमुकलीचा आगीच होरपळून मृत्यू झाला होता. दिवाळीच्या रोषणाईत शॉर्टसर्कीटमुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
advertisement
या घटनेसोबत कामोठेमध्ये देखील अशीच घटना घडली होती. कामोठे सेक्टर 36 मधील आंबे श्रध्दा सहकारी गृहनिर्माण सोसायटीतही आग लागल्याची घटना घडली होती. या आगीत दुसऱ्या मजल्यावर राहणाऱ्या रेखा सिसोदिया वय (45)आणि मुलगी पायल सिसोदिया (19) या मायलेकींचा होरपळून मृत्यू झाला होता.या घटनेत सुरूवातीला शॉर्ट सर्किट झाला होता,त्यानंतर सिलिंडरचा स्फोट होऊन ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Navi Mumbai Fire : नवी मुंबईच्या आगीच्या घटनेत मोठी अपडेट, दिवाळीत जीव गमावलेल्या 'त्या' चौघांच्या मृत्युचं खरं कारण समोर
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement